शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ऐका हो ऐका, नवी मुंबई विकणे आहे

By नारायण जाधव | Updated: July 29, 2024 10:22 IST

घणसोली येथील राज्य क्रीडा संकुलासाठीचा भूखंड सिडकोने विकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनासह सिडकोची अब्रू वेशीवर टांगली आहे.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

सध्या नवी मुंबई शहर हे महापालिका, सिडको आणि एमआयडीसी या तिन्ही प्राधिकरणांच्या त्रांगड्यात सापडले आहे. कुणीही येतो अन् शहराचे नियोजन आणि विकास प्राधिकरण असलेल्या नवी मुंबई महापालिकेसह शहरातील लोकप्रतिनिधींना विचारात न घेता शहरातील वाट्टेल त्या भूखंडावर वाट्टेल ते आरक्षण टाकून ते भूखंड विकून मोकळे होत आहेत. यामुळे शहरातील सामाजिक आणि सार्वजनिक सुविधांची पुरती वासलात लागली आहे. घणसोली येथील राज्य क्रीडा संकुलासाठीचा भूखंड सिडकोने विकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनासह सिडकोची अब्रू वेशीवर टांगली आहे.

सध्या तर सामाजिक आणि सार्वजनिक सुविधांचे भूखंड विकणे, पुनर्विकासाच्या नावाखाली कुठेही वाट्टेल तेवढे चटईक्षेत्र देणे आणि पाम बीच मार्गावरील पाणथळींच्या जागा, सीआरझेड क्षेत्रासह करावे द्वीपावर वाणिज्यिक वापराला परवानगी देणे, असे धोरण अंगीकारून राज्याच्या नगरविकास खात्याने नवी मुंबई शहरच विकायला काढले आहे. १९८०-९० च्या दशकात नवी मुंबईत आलेल्या प्रत्येकाला आपण  विदेशातील शहरात आल्याचा भास होत असे. देखणी रेल्वे स्थानके, मोठेमोठे चौक, फेरीवालेविरहित चकचकीत रस्ते असे देखणे रूप येथे बघायला मिळायचे. 

२००० ते २००५ पर्यंत हे चित्र होते. मात्र नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसी या तिन्ही प्राधिकरणांच्या जागेवर हे शहर वसले आहे. त्यातच महापालिकेच्या मालकीची जमीनच नव्हती. सार्वजनिक, सामाजिक सुविधांचे भूखंड सिडकोनेे हस्तांतरित केल्यावर त्यांची मालकी आली; मात्र उपनगरीय रेल्वेचा पसारा वाढला. ट्रान्स हार्बर मार्ग सुरू झाला. एमआयडीसीतील जुन्या रासायनिक कंपन्यांच्या जागी आयटी पार्क, दूरसंचार कंपन्या, डेटा सेंटर्सचे जाळे उभे राहिल्याने येथील जागांना मोल आले. यातूनच आधी सिडकोच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे पर्व सुरू झाले. सुस्थितीतील इमारतीही धोकादायक ठरवून त्या पुनर्विकासासाठी बिल्डरांना दिल्या.

भूखंडांना सोन्यापेक्षा जास्त माेल आल्याने सिडको आणि एमआयडीसीने महापालिकेचे सामाजिक आणि सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड विकून खाल्ले. ठेकेदारी आणि टक्केवारीचे हे राजकारण इतके पेटले की, सध्या नवी मुंबई महापालिकेकडे भूखंड नसल्याने जनतेला या सुविधा द्यायच्या कशा? असा प्रश्न निर्माण झाला. 

पाम बीच मार्गावरील पाणथळींसह करावे बेटही एका मोठ्या उद्योजकाच्या घशात घालण्याचे घाटत आहे. याचाच उद्रेक शहराचे नेते गणेश नाईक यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणात दिसला. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच पिंजऱ्यात उभे केले. भाजप नेतृत्वानेही यावर मौन बाळगले. यामुळेच सूज्ञ नवी मुंबईकर आता ‘राज्यकर्त्यांनी नवी मुंबई शहर विकणे आहे,’ असा बोर्डच मंत्रालयाबाहेर लावायला हवा, असे म्हणत आहेत.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई