शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

नवी मुंबईत पाचशे चौरस फुटापर्यंतची घरे करमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 23:43 IST

महापालिका कार्यक्षेत्रामधील ५०० चौरस फूट क्षेत्रफळांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील ५०० चौरस फूट क्षेत्रफळांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करामध्ये ६० टक्के सवलत प्रस्तावित केली आहे. सर्वसाधारण सभेने मंजुरी केलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासन मंजुरी मिळाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.विधानसभा व त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरवासीयांची मने जिंकण्यासाठी शासनाच्या व महापालिकेच्या माध्यमातून नवीन योजना मंजूर करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने ५०० चौरस फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी याविषयी अशासकीय ठराव मांडला होता. १९९२ मध्ये ग्रामपंचायती विसर्जित करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली. शहरात सिडकोने विकसित केलेले नोड, एमआयडीसीमधील झोपडपट्ट्या, मूळ २९ गावे असा परिसर येतो. सद्यस्थितीमध्ये महापालिकेकडे ३ लाख १४ हजार मालमत्ता आहेत. कमी उत्पन्न गटाचे नागरिक, माथाडी कामगारांसाठी घरे बांधली आहे.महापालिकेने मालमत्ता कर माफीचा घेतलेला निर्णय सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या हिताचा आहे. जवळपास सव्वालाख नागरिकांना याचा लाभ होऊ शकतो. एक महिन्यापासून या विषयावरून राजकारण तापले आहे. महापौर जयवंत सुतार यांनी करमाफीचा प्रस्ताव मांडणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर विरोधी पक्षांनी ही निवडणुकीसाठी स्टंटबाजी असल्याची घोषणा केली होती. शिवसेनेकडून ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना कर माफी देण्याची मागणी केली होती. यामुळे सभागृहात कोण काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रस्ताव चांगला आहे, परंतु यात सुधारणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.।सार्वजनिक ठिकाणी पार्किंग मोफतशहरातील मॉल, चित्रपटगृह, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, उद्याने, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पार्किंग नि:शुल्क करण्यात यावे. पुणे व नाशिक महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे नवी मुंबईमध्येही पार्किंगसाठी शुल्क आकारले जाऊ नये, असा ठराव सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी मांडला होता. या प्रस्तावालाही मंजुरी दिली असून तोही अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी मिळाली तर शहरवासीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.।प्रशासनाने अर्थसंकल्पात अभय योजनेचा प्रस्ताव आणला होता; परंतु तो शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे. हा प्रस्ताव प्रशासनानेही सभागृहात आणावा, त्यावरदेखील चर्चा करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा. शहरवासीयांसाठी महत्त्वाचा ठराव असल्याने या ठरावाला मंजुरी देत आहोत.- जयवंत सुतार, महापौरया प्रस्तावाची वेळ चुकीची की बरोबर आहे, हे ठरवून चालणार नाही. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना सूट देण्याबाबत महापालिकेने निर्णय घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले असून, त्यांच्या आवाहनाला नवी मुंबई महापालिकेने प्रतिसाद दिला आहे. सदर ठराव सभागृहाने आणलेला असल्याने तो अशासकीय नाही. सदर ठराव सभागृहाची भावना आहे.- सुधाकर सोनावणे, नगरसेवकप्रस्ताव चांगला आहे; परंतु सवलत नाही संपूर्ण करमाफी हवी. झोपडपट्टीमधील गरीब जनतेला शौचालये, पाण्याचे बिल, लाइट बिल भरणेही शक्य नसते, या ठरावानुसार झोपडपट्टीमधील नागरिकांना करमाफी होत आहे, त्याप्रमाणे पाण्याचे बिलदेखील माफ व्हावे.- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते>ठराव चांगला आहे ठरावाला विरोध नाही; परंतु बजेटच्या वेळी हा ठराव मंजूर केला असता तर अधिक बरे झाले असते. ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना देण्यात येणारी करमाफी आणि सवलत यामुळे ३० टक्केही भूमिपुत्रांना याचा फायदा होणार नाही. यासाठी बिल्डअप एरिया १००० चौरस फूट करावा. सदर प्रस्ताव प्रशासनाकडून आला असता तर त्याला शासनस्तरावरही लवकर मंजुरी मिळाली असती.- द्वारकानाथ भोईर, गटनेते, शिवसेना>विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर हा ठराव येणे योगायोग दिसत आहे. यापूर्वीदेखील निवडणुकांच्या तोंडावर अनेक ठराव मंजूर करण्यात आले आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही. सर्वसामान्य कामगार व प्रकल्पग्रस्तांच्या घरांना पूर्णपणे करमाफी देण्यात यावी.- रामचंद्र घरत, गटनेते, भाजप

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई