शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नवी मुंबई : शहरात दररोज १००० किलो गुटखा विक्री, तस्करी करणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 02:54 IST

गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व राज्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठा करण्यावर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाला साडेपाच वर्षे पूर्ण झाली असून सद्यस्थितीमध्ये गुटखा विक्री फक्त कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व राज्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठा करण्यावर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाला साडेपाच वर्षे पूर्ण झाली असून सद्यस्थितीमध्ये गुटखा विक्री फक्त कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे.नवी मुंबई व पनवेलमधील ५ हजारपेक्षा पानटपरी व किराणा दुकाने व छोट्या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे गुटखा विकला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी, फळ, कांदा, बटाटा,मसाला व धान्य मार्केटमधील प्रत्येक पानटपरीवर सर्वांना दिसतील अशाप्रकारे गुटख्याच्या माळा लावून ठेवण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील विक्रेत्यांना गुटखा बंदीविषयी विचारले असता बंदी असली तरी सर्वत्र गुटखा मिळतो. पोलीस, एपीएमसी, एफडीएवाल्यांना खूश केले की कोणी कारवाई करत नसल्याचे सांगण्यात आले. सर्वांची परवानगी असल्यामुळेच गुटखा विकता येत असल्याचे उत्तर देण्यात आले. बाजार समितीमधील कामगार, व्यापारी व इतर घटकांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले असून त्यांना प्रत्येक पानटपरीवर सहजपणे हवा त्या ब्रँडचा गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे.महाराष्ट्रामध्ये गुजरातवरून गुटखा विक्रीसाठी येत आहे. अहमदाबादमध्ये उत्पादन होत असलेल्या विमल गुटख्याची सर्वत्र चलती आहे. पाच रुपयांची विमलची पुडी ८ रुपयांना व १० रुपये किमतीची पुडी १५ रुपयांना विकली जात आहे. गोवा, राज कोल्हापुरी, सागर व इतर कंपनीचा गुटखाही सर्व पानटपरीवर विकला जात आहे. यावर त्याचे उत्पादन कुठे होते याची काहीही माहिती दिलेली नाही. आरएमडी गुटखा सर्वात महाग असून एका पुडीसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. गुजरातमधील अहमदाबादमधील बडोदा शहरात याची निर्मिती होत असून फक्त निर्यातीसाठी उत्पादित केला जाणारा हा गुटखा स्थानिक बाजारपेठेमध्ये विकला जात आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºया गुटखा व्यवसायामध्ये माफियांचा समावेश आहे. गुटखा विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असून त्यांच्यावर पोलीस, अन्न व औषध प्रशासन, महापालिका व इतर कोणीही कारवाई करत नसल्याने त्यांचेच अभय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.१५ टपºयांची मालकीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुन्ना, राकेश, राजाबाबू, दीपक हे चार जण पानटपºयांना गुटखा पुरविण्याचा व्यवसाय करत होते. या व्यवसायातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमविले आहेत. सद्यस्थितीमध्ये भाजी व फळ मार्केटमध्ये तब्बल १५ टपºया त्यांनी विकत घेतल्या आहेत. या टपºया परप्रांतीयांना चालविण्यास दिल्या असून त्यामधून रोज हजारो रुपयांची उलाढाल सुरू आहे. एपीएमसीच्या बाहेरही हे वितरक गुटखा पुरवत असून त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही.पदपथावरही पानटपºयाएपीएमसीच्या भाजी मार्केटपासून विस्तारित मार्केटकडे जाणाºया रोडच्या सुरवातीला अनधिकृतपणे पानटपरी उभारण्यात आली आहे. याठिकाणी गुटखा विक्रीपासून खाद्यपदार्थ विक्रीही सुरू आहे. भाजी मार्केटच्या जावक गेटच्या बाहेरही पदपथावर पानटपरी सुरू केली आहे. फळ मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या गेटवरही पानटपरी सुरू असून सर्व ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू असून त्यावर कोणीही कारवाई करत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई