शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

निसर्ग उद्यानातील कर्मचा-याचा डेंग्यूने मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष, भंगार साहित्यामुळे कर्मचा-यांचा जीव धोक्यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 6:59 AM

कोपरखैरणे निसर्ग उद्यानामध्ये काम करणा-या अनिल मारुती पाटील (४२), या कंत्राटी कामगाराचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. अतिक्रमण विभागाने येथे ठेवलेले भंगार साहित्य व खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणे निसर्ग उद्यानामध्ये काम करणा-या अनिल मारुती पाटील (४२), या कंत्राटी कामगाराचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. अतिक्रमण विभागाने येथे ठेवलेले भंगार साहित्य व खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. लोकप्रतिनिधींनी साफसफाईची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने तुर्भे डम्पिंग ग्राउंड बंद करून तेथे निसर्ग उद्यान विकसित केले आहे. निसर्ग उद्यानाची देखभाल करण्यासाठी १३ कर्मचारी नियुक्त केले आहेत. निसर्ग उद्यानाला लागूनच महापालिकेने भंगाराचे गोडाऊन तयार केले आहे. शहरामध्ये अतिक्रमण विभागाने कारवाई केलेले सर्व साहित्य याच ठिकाणी ठेवण्यात येत आहे. फेरीवाल्यांच्या जप्त केलेल्या वस्तू, भंगार वाहनेही या ठिकाणी ठेवण्यात येत आहेत. या भंगार साहित्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. याशिवाय या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्येही पाणी साचून राहात आहे. या सर्वांमुळे परिसरामध्ये डासांचा उपद्रव वाढला आहे. निसर्ग उद्यानामध्ये काम करणाºया अनिल मारुती पाटील या कर्मचाºयालाही आॅगस्ट अखेरीस ताप येऊ लागला. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले; परंतु डेंग्यूमुळे पेशींची संख्या कमी झाली व अखेर ३ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला आहे. उद्यान विभागातील कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यामुळे इतर कर्मचाºयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने योग्य काळजी घेतली नाही, तर अजून कर्मचाºयांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे.निसर्ग उद्यानामधील कर्मचाºयांच्या समस्या, भंगार साहित्यामुळे निर्माण होणारी डासांची उत्पत्ती याविषयी प्रभाग ५२च्या नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे यांनी महापालिकेच्या अधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. निसर्ग उद्यानाच्या बाजूचा भूखंड मोकळा करण्यात यावा. तेथील सर्व भंगार साहित्य हटविण्यात यावे व त्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. भंगार साहित्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. एका कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या परिसराची योग्य साफसफाई केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही कचरे यांनी दिला आहे.निसर्ग उद्यानाच्या बाजूला भंगार वाहने, अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य टाकले जात आहे. यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागली आहे. एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला असून, आता तरी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी.- निर्मला कचरे,नगरसेविका, प्रभाग ५२