शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नाव मोठे... लक्षण खोटे...

By admin | Updated: May 5, 2017 06:17 IST

कामोठे वसाहतीत ११ ते १३ हे तीन प्रभाग आहेत. निवडणुकांमुळे सध्या प्रभागात प्रचाराला वेग आला असला तरी याठिकाणी पिण्याचे

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीकामोठे वसाहतीत ११ ते १३ हे तीन प्रभाग आहेत. निवडणुकांमुळे सध्या प्रभागात प्रचाराला वेग आला असला तरी याठिकाणी पिण्याचे पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, गटार आदी समस्या गंभीर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वसाहतीला या समस्या भेडसावत असल्या तरी याबाबत योग्य उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळेच नाव मोठे नि लक्षण खोटे अशी स्थिती वरील तीनही प्रभागात दिसून येते. सिडकोने या वसाहतीबाबत कायम दुजाभाव केला आहे. महापालिका झाल्याने आतातरी समस्या सुटतील अशी अपेक्षा स्थानिकांना आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना स्थानिकांच्या अपेक्षा पूर्तीकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एका बाजूला पनवेल - सायन महामार्ग आणि दुसऱ्या बाजूला मानसरोवर व खांदेश्वर रेल्वेस्थानक यामुळे कामोठे वसाहतीला चाकरमान्यांकडून विशेष पसंती दिली जाते. या ठिकाणी घर घेणाऱ्यांबरोबरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले अनेक कुटुंब या तीनही प्रभागात स्थायिक झालेले आहेत. या व्यतिरिक्त गुजराती आणि राजस्थानी लोकांची संख्याही मोठी आहे. स्थानिक आगरी, कराडी आणि कोळी समाजाचे लोकही मोठ्या प्रमाणात कामोठे वसाहतीत वास्तव्यास आहेत. वसाहतीतील पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. याचे कारण नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणावर कामोठेकरांना अवलंबून राहावे लागते. मात्र मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी कामोठे वसाहतीत दिवसाआड पाणी दिले जात होते. आता परिस्थिती काहीशी बरी असली तरी इतर वसाहतीप्रमाणे तीनही प्रभागात मुबलक पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांत योग्य देखभाल न झाल्याने पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होते. पावसाळी नाल्यांची साफसफाईही ठेकेदार करीत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथावर अतिक्रमण केल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी एनएमएमटी सुरू केली असली तरी फेऱ्या अपुऱ्या आहेत. बायोमेडिकल वेस्ट बिनधास्तपणे मोकळ्या जागेवर टाकले जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचऱ्याची समस्या नित्याचीच असून सिडकोकडून औषध फवारणी नियमित केली जात नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकही हैराण झाले आहेत.तीनही प्रभागात बीअर शॉपी, बारची संख्या मोठी आहे. पाचशे मीटर अंतरामुळे काही बार बंद झाले असले तरी त्याठिकाणी चोरून दारू विक्र ी होते. येथील काही बार मालकाने थेट इमारतीची स्टील्ट पार्किंग अडवून तिथे किचन टाकले आहे. याविरोधात रहिवाशांनी पाठपुरावा करूनही त्यांना सिडको, पोलीस यंत्रणा दाद देत नाही.दोन कि.मी.चा वळसाकामोठे वसाहतीलगत पनवेल - सायन महामार्गाचे सर्व्हिस रोडचे काम रखडले आहे. त्यामुळे रहिवाशांना मुंबईकडे जाण्याकरिता थेट कळंबोलीला वळसा घालावा लागतो. याबाबत वारंवार आंदोलने, तसेच पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली निघालेला नाही.