शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

नाव मोठे... लक्षण खोटे...

By admin | Updated: May 5, 2017 06:17 IST

कामोठे वसाहतीत ११ ते १३ हे तीन प्रभाग आहेत. निवडणुकांमुळे सध्या प्रभागात प्रचाराला वेग आला असला तरी याठिकाणी पिण्याचे

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीकामोठे वसाहतीत ११ ते १३ हे तीन प्रभाग आहेत. निवडणुकांमुळे सध्या प्रभागात प्रचाराला वेग आला असला तरी याठिकाणी पिण्याचे पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, गटार आदी समस्या गंभीर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वसाहतीला या समस्या भेडसावत असल्या तरी याबाबत योग्य उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळेच नाव मोठे नि लक्षण खोटे अशी स्थिती वरील तीनही प्रभागात दिसून येते. सिडकोने या वसाहतीबाबत कायम दुजाभाव केला आहे. महापालिका झाल्याने आतातरी समस्या सुटतील अशी अपेक्षा स्थानिकांना आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना स्थानिकांच्या अपेक्षा पूर्तीकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एका बाजूला पनवेल - सायन महामार्ग आणि दुसऱ्या बाजूला मानसरोवर व खांदेश्वर रेल्वेस्थानक यामुळे कामोठे वसाहतीला चाकरमान्यांकडून विशेष पसंती दिली जाते. या ठिकाणी घर घेणाऱ्यांबरोबरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले अनेक कुटुंब या तीनही प्रभागात स्थायिक झालेले आहेत. या व्यतिरिक्त गुजराती आणि राजस्थानी लोकांची संख्याही मोठी आहे. स्थानिक आगरी, कराडी आणि कोळी समाजाचे लोकही मोठ्या प्रमाणात कामोठे वसाहतीत वास्तव्यास आहेत. वसाहतीतील पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. याचे कारण नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणावर कामोठेकरांना अवलंबून राहावे लागते. मात्र मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी कामोठे वसाहतीत दिवसाआड पाणी दिले जात होते. आता परिस्थिती काहीशी बरी असली तरी इतर वसाहतीप्रमाणे तीनही प्रभागात मुबलक पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांत योग्य देखभाल न झाल्याने पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होते. पावसाळी नाल्यांची साफसफाईही ठेकेदार करीत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथावर अतिक्रमण केल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी एनएमएमटी सुरू केली असली तरी फेऱ्या अपुऱ्या आहेत. बायोमेडिकल वेस्ट बिनधास्तपणे मोकळ्या जागेवर टाकले जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचऱ्याची समस्या नित्याचीच असून सिडकोकडून औषध फवारणी नियमित केली जात नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकही हैराण झाले आहेत.तीनही प्रभागात बीअर शॉपी, बारची संख्या मोठी आहे. पाचशे मीटर अंतरामुळे काही बार बंद झाले असले तरी त्याठिकाणी चोरून दारू विक्र ी होते. येथील काही बार मालकाने थेट इमारतीची स्टील्ट पार्किंग अडवून तिथे किचन टाकले आहे. याविरोधात रहिवाशांनी पाठपुरावा करूनही त्यांना सिडको, पोलीस यंत्रणा दाद देत नाही.दोन कि.मी.चा वळसाकामोठे वसाहतीलगत पनवेल - सायन महामार्गाचे सर्व्हिस रोडचे काम रखडले आहे. त्यामुळे रहिवाशांना मुंबईकडे जाण्याकरिता थेट कळंबोलीला वळसा घालावा लागतो. याबाबत वारंवार आंदोलने, तसेच पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली निघालेला नाही.