शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आठवडे बाजारांकडे महापालिकेची पाठ, गुन्हेगारांचे ‘अर्थ’कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:56 AM

नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने फेरीवाल्यांकडून रहदारीचे प्रमुख रस्ते, तसेच खेळाची मैदाने व्यापली जात आहेत. मात्र, अशा आठवडे बाजारांमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडले असून, गुन्हेगारीवाढीलाही ते कारणीभूत ठरत आहेत.शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरणारे आठवडे बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. ग्रामीण भागातील गरजेची आठवडे बाजाराची ही पद्धत शहरी भागात केवळ अर्थकारणासाठी वापरली जात आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून एका दिवशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता आठवडे बाजार भरवले जातात. त्या ठिकाणी शेतीच्या आवश्यक साधनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू, भाजेपाल्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. मात्र, शहरी भागात मोठ्या प्रमाणात दुकाने, बाजारपेठा उपलब्ध असल्याने दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या गरजा कोणीही सहज भागवू शकतो. त्याकरिता आठवडे बाजाराची आवश्यकता नसतानाही, केवळ काही व्यक्तींच्या पुढाकारातून ते भरवले जात आहेत. त्याकरिता गाव-गावठाणांतील रस्ते, खेळाची मैदाने या ठिकाणी फेरीवाले बसवले जात आहेत. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते १००० रुपये भाडे संबंधित व्यक्तीकडून आकारले जात असल्याचेही समजते. तर बाजारात अधिकाधिक फेरीवाले बसावेत, याकरिता शहराबाहेरून फेरीवाल्यांना निमंत्रित केले जात आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने गुन्हगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीही शहरात फेरफटका मारत आहेत.काही दिवसांपूर्वी मच्छीविक्रेते बनून आलेल्या टोळीने सानपाडा येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत; परंतु ज्याच्या घरासमोर बाजार भरवला जातो, त्यांनाही संबंधितांकडून रसद पुरवली जात असल्याचे बोलले जात आहे; परंतु संपूर्ण प्रकाराचा नाहक त्रास इतर नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अशा वेळी वादाचे प्रकार घडत असून, त्याचे पडसाद हाणामारीतही उमटत आहेत.