शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नववर्षात कंत्राटी कामगारांना महापालिकेने दिली भेट, सहा हजार कामगारांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:46 IST

महानगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांना १३ महिन्यांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांना १३ महिन्यांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ७३ कोटी ११ लाख १७ हजार रुपये देण्याच्या ४६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तब्बल सहा हजारपेक्षा जास्त कामगारांना याचा लाभ होणार असून, नवीन वर्षाची भेट मिळाल्यामुळे कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.नवी मुंबई महानगरपालिका साफसफाई, कचरा वाहतूक, उद्यान, विद्युत, शिक्षण व इतर विभागांमधील कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेत आहे. सद्यस्थितीमध्ये जवळपास ६,२७७ पेक्षा जास्त कामगार या विभागांमध्ये काम करत आहेत. कामगारांना किमान वेतनाची रक्कम कमी असल्यामुळे महापालिकेने समान कामास समान वेतन सुरू केले होते; परंतु शासनाने २०१५ मध्ये किमान वेतनामध्ये वाढ केली. पालिकेच्या समान वेतनापेक्षा किमान वेतनाची रक्कम जास्त असल्यामुळे कामगार संघटनांनी पुन्हा किमान वेतन मिळावे, यासाठी पाठपुरावा केला.महापालिकेने मे २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करून किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला. शासनाने दिलेली मंजुरी व महापालिकेने प्रत्यक्षात केलेली अंमलबजावणी यामधील कालवधीमधील वेतनाचा फरक देण्यासाठी कामगारांनी पाठपुरावा केला होता. सर्वसाधारण सभेने आॅगस्ट २०१९ मध्ये किमान वेतनातील फरक देण्यासाठीच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली होती.प्रशासकीय मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामगारांना त्याच्या लाभासाठी ९१ साफसफाई ठेकेदार, उद्यान व इतर सर्व विभागांमधील कामगारांना याचा लाभ देण्यासाठी ४६ प्रस्ताव तयार करण्यात आले. या प्रस्तावांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये कंत्राटी कामगारांचे योगदानही महत्त्वाचे आहे.राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान व आता केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईने ठसा उमटविला असून, त्यामध्ये कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. यामुळे कंत्राटी कामगारांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून वेतनामधील १३ महिन्यांच्या फरकाची रक्कमही देण्यात येत आहे.कामगारांना लवकरात लवकर ही रक्कम देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ठेकेदारांकडून पैसे देण्यास विलंब होतो, असेही काही लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे ठेकेदारांनी कामगारांची पिळवणूक करू नये,असे मतही व्यक्त करण्यात आलेआहे.कामगार संघटनांनीही प्रत्यक्षात कामगारांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर आम्ही आनंदोत्सव साजरा करू, असे स्पष्ट केले आहे. स्थायी समितीमध्ये हा विषय लवकरयावा, यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनीही आग्रहाची भूमिका घेतली होती.कंत्राटी कामगारांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. १३ महिन्यांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेऊन कामगारांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. लवकरात लवकर फरकाची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.- नवीन गवते,स्थायी समिती, सभापतीकंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करावे व वेतनातील फरक मिळावा, यासाठीही शिवसेनेने नेहमीच पाठपुरावा केला आहे. स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव लवकर घेण्यात यावा, यासाठीही आग्रही भूमिका घेतली होती. हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे आनंद होत आहे.- रंगनाथ औटी,नगरसेवक, शिवसेना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका