शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पकडा गया वो चोर अन् बाकीचे मात्र साव

By नारायण जाधव | Updated: August 4, 2025 09:40 IST

महापालिकेची दिलेली कबुली पाहता सुनियोजित नवी मुंबईत ही बांधकामे झालीच कशी, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यांना वीज, पाणी, मिळाले कसे? त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी चौरस फुटाप्रमाणे दर कोण वसूल करतो? असे प्रश्न निर्माण होतात.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक -

अनधिकृत बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर ठाण्यातील अनेक इमारती तेथील महापालिकेने तोडल्या. कल्याण-डोंबिवलीतही अनेक इमारतींवर कारवाई झाली. वसई-विरारमधील अनागोंदीने तर महापालिकांतील भ्रष्ट कारभाराची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. तेथील आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत; परंतु ‘पकडा गया वो चोर अन् बाकीचे मात्र साव’ असा काहीसा प्रकार सुनियोजित शहर म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नवी मुंबई, जवळचे पनवेल शहर व सिडकोच्या नैना क्षेत्रात पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईतील चार हजार अनधिकृत बांधकामांवरून काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका, सिडकोवर गंभीर ताशेरे ओढून सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यास सांगितले. यानंतर महापालिकेने नवी मुंबईतील २४,८३० अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण केले. यात जमिनीची मालकी नसताना शंभर टक्के अतिक्रमित ७,००० बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

महापालिकेची दिलेली कबुली पाहता सुनियोजित नवी मुंबईत ही बांधकामे झालीच कशी, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यांना वीज, पाणी, मिळाले कसे? त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी चौरस फुटाप्रमाणे दर कोण वसूल करतो? असे प्रश्न निर्माण होतात. याच भ्रष्ट कारभारामुळे मागे कोपरखैरणे येथे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात लाच प्रतिबंधक विभागाने काही अधिकाऱ्यांना पकडले होते. तेव्हा एका वरिष्ठास वाचविण्यास वाशी-कोपरखैरणेतील नेत्यांनी ठाण्यात एसीबीच्या एका मोठ्या अधिकाऱ्यास ५० लाखांची बिदागी मोजून लोखंडाचे सोने कसे केले हे ते खुमासदारपणे सांगत सुटले होते. हा इतिहास असला तरी केवळ एमआयडीसी आणि सिडकोच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांच्याच बाबतीत हा प्रकार नसून रीतसर परवानगी घेऊन वाढीव बांधकामे केल्याचे प्रकार घडले आहेत. सध्या तर नवी मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. अनेक नियमांना वाशी खाडीत बुजवून हा पुनर्विकास करण्यात येत आहे. यासाठी काही माजी अधिकाऱ्यांनी तर चौरस मीटरमागे बिदागी मोजा अन् बिनधास्त पुनर्विकास करा, असे बेलापुरात दुकानच थाटले आहे. सिडकोतही काही अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या नावाने वाढीव चटई क्षेत्रासाठी राबविलेल्या साडेतीन हजारांच्या धोरणाची जर चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर पडतील. 

महापालिका केवळ कागदी घोडे नाचवत आहे. न्यायालयाने शहरातील चार हजार अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करायला सांगितल्यावर अशा बांधकामांची संख्या २५ हजारांच्या घरात गेली. हे कमी म्हणून ही की काय शहरात ओसी नसलेल्या २१११ इमारती महापालिकेस वाकुल्या दाखवून उभ्या आहेत. कारण हरित वसई संस्थेच्या २००७ सालच्या याचिकेवरील आदेशानुसार नगरविकास विभागाने मार्च २००९ मध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही १४ सदस्यीय समिती स्थापन केली. तिचे पुढे काय झाले, शिवाय अनधिकृत बांधकामांच्या याद्या किती पालिकांनी दुय्यम निबंधकांकडे दिल्या, वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या, स्वतंत्र पोलिस ठाणे, विशेष न्यायालये हे गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयthaneठाणे