अनधिकृत झोपडपट्टीत जास्त कुपोषण
By Admin | Updated: September 17, 2014 01:30 IST2014-09-17T01:30:00+5:302014-09-17T01:30:00+5:30
अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

अनधिकृत झोपडपट्टीत जास्त कुपोषण
मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपडय़ा हा विषय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतोच. मात्र एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीमुळे हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आह़े कारण अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर आणि इंडियन ऑइलनगर या दोन झोपडपट्टय़ांमधील 3क्क् लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ऑब्झव्र्हर रिसर्च फाउंडेशन आणि एम. बी. बारविला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हे सर्वेक्षण करण्यात आले. अनधिकृत झोपडपट्टीमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. यामध्ये असेही आढळून आले आहे की, यापैकी 41 टक्के मुले ही त्यांना मिळणा:या मिडडे मिलमधले अर्धे किंवा त्याहून कमी अन्न खातात. आणि इतर अन्न फेकून देतात. कुपोषणाचा परिणाम हा फक्त मुलांच्या शारीरिक वाढीवर होत नाही, तर बौद्धिक वाढीवरदेखील होतो. कुपोषित मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, एकाग्रता कमी असते.
मुलांची वाढ देखील खुंटलेली दिसल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसून आले आहे. अधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 34 टक्के मुलांची वाढ खुंटलेली दिसून आली तर अनधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 51.33 टक्के मुलांची वाढ खुंटलेली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही मुलांना चांगल्या सवयी नसल्याचेही दिसून आले आहे. त्यांची वर्तणूक सामान्य मुलांसारखी नसून त्रसदायक असल्याचेही दिसून आले आहे. ज्या मुलांच्या घरी पाण्याची जोडणी नाही, रोजच्या रोज अन्न मिळत नाही,
ज्यांच्या घराच्या आजूबाजूचा
परिसर अस्वच्छ आहे अशा मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)
कुपोषण कमी करण्यासाठी काय करू शकता ? अंगणवाडीत मिडडे मेल, खाऊ दिला जातो त्यामध्ये बदल करण्यात यावा. मुलांना कशाची गरज आहे, काय खातील याचा विचार केला गेला पाहिजे. मुलांसाठी कोणते अन्न सकस आहे, याविषयी पालकांमध्ये जागृती केली पाहिजे. महापालिका शाळांमधील आरोग्य कार्यक्रमात बदल करण्यात यावेत. स्थलांतरित मुलांर्पयत पोहचण्यासाठी काही उपाययोजना आखल्या पाहिजेत. झोपडपट्टीतील आरोग्याविषयी पुन्हा एकदा विचार करून आरोग्याची आखणी केली पाहिजे.