शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 00:59 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मोकळ्या जागेवर माल ठेवणा-यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मोकळ्या जागेवर माल ठेवणा-यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. सुरक्षारक्षकांनी अपशब्द वापरल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी आंदोलन सुरू केले व अर्धा दिवस मार्केट बंद ठेवले. वरिष्ठ अधिकाºयांनी मध्यस्ती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही दिवसांपासून कृषिमालाची आवक प्रचंड वाढली आहे. मागणीपेक्षा दुप्पट माल विक्रीसाठी येऊ लागला आहे. मंगळवारी तब्बल १३२ ट्रक, टेम्पो कांदा, ७७ वाहनांमधून बटाटा व ११ वाहनांमधून लसून विक्रीसाठी आली आहे. रोज २०० पेक्षा जास्त वाहनांची आवक होऊ लागली असून, विक्रीसाठी आलेला माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुना व नवीन दोन्ही प्रकारचा कांदा विक्रीसाठी येत आहे. जागा नसल्यामुळे हा माल मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवला जात आहे. नियमाप्रमाणे माल मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवता येत नसल्यामुळे काही जणांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मोकळ्या पॅसेजमधून चालता येत नसल्यामुळे कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने उपसचिवांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होता. कारवाईदरम्यान व्यापारी व बाजार समितीच्या सुरक्षारक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. संतापलेल्या व्यापाºयांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. गाळ्यांची शटर खाली ओढण्यास सुरुवात केली. मार्केटमधील सर्व व्यवहार ठप्प झाले. कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाच्या कार्यालयामध्ये व्यापाºयांनी बैठक घेऊन अपशब्द वापरणाºयांचा निषेध केला. शेतकºयांच्या मालाला ग्राहक मिळेनासे झाले आहेत. राज्यात कुठेच जुना कांदा विकला जात नाही, यामुळे शेतकरी तो माल मुंबईला पाठवत आहेत. माल ठेवण्यासाठीही जागा नसल्यामुळे खुल्या पॅसेजमध्ये ठेवण्यात येत आहे. प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई सुरू केली असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.व्यापाºयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सहसचिव अविनाश देशपांडे, उपसचिव आय. आर. मसाराम यांनी अडत व्यापारी संघात जाऊन व्यापाºयांबरोबर चर्चा केली. मार्केटमधील समस्या सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली. मार्केटमध्ये वाहने उभी करण्याबरोबर इतर समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. देशपांडे यांनी व्यापाºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. या बैठकीला व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, माजी संचालक अशोक वाळूंज, राजिव मणियार, भरत मोरे, सुरेश शिंदे व इतर सर्व व्यापारी उपस्थित होते. व्यापाºयांची भावना लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांनही दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा वाद मिटला.>सहसचिवांमुळे वाद मिटलाकांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाºयांनी व्यापार बंद करून प्रशासनाचा निषेध केला. यामुळे मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. बंदमुळे नुकसान अजून वाढण्याची शक्यता होती. बाजार समितीचे सहसचिव अविनाश देशपांडे यांनी प्रसंगावधान राखून व्यापाºयांची समजूत घातली व त्यांच्या आवाहनानंतर व्यापाºयांनी बंद मागे घेतला व शेतकºयांचे मोठे नुकसान टळले.>बाजार समितीमध्ये कांदा-बटाट्याची आवक प्रचंड वाढली आहे. येणारा माल ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही, यामुळे काही माल पॅसेजमध्ये ठेवला जात आहे. या मालावर प्रशासनाने कारवाई केली व सुरक्षारक्षकांनी अपशब्द वापरल्यामुळे मार्केट काही वेळ बंद ठेवले होते.- राजेंद्र शेळके,अध्यक्ष,कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ>एपीएमसीमध्ये कांदा व बटाट्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. रोज २०० पेक्षा जास्त गाड्यांमधून कृषिमाल विक्रीसाठी येत असून, तो ठेवण्यासाठी जागा मिळेना झाली आहे. लिलावगृहासह गाळ्यांच्या बाहेर ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेवर गोण्या ठेवल्या जात आहेत. संपूर्ण मार्केट कांदामय झाले आहे. बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असून या मालावर कारवाई करून प्रशासनाने शेतकºयांचे नुकसान करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.