शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 00:59 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मोकळ्या जागेवर माल ठेवणा-यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मोकळ्या जागेवर माल ठेवणा-यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. सुरक्षारक्षकांनी अपशब्द वापरल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी आंदोलन सुरू केले व अर्धा दिवस मार्केट बंद ठेवले. वरिष्ठ अधिकाºयांनी मध्यस्ती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही दिवसांपासून कृषिमालाची आवक प्रचंड वाढली आहे. मागणीपेक्षा दुप्पट माल विक्रीसाठी येऊ लागला आहे. मंगळवारी तब्बल १३२ ट्रक, टेम्पो कांदा, ७७ वाहनांमधून बटाटा व ११ वाहनांमधून लसून विक्रीसाठी आली आहे. रोज २०० पेक्षा जास्त वाहनांची आवक होऊ लागली असून, विक्रीसाठी आलेला माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुना व नवीन दोन्ही प्रकारचा कांदा विक्रीसाठी येत आहे. जागा नसल्यामुळे हा माल मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवला जात आहे. नियमाप्रमाणे माल मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवता येत नसल्यामुळे काही जणांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मोकळ्या पॅसेजमधून चालता येत नसल्यामुळे कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने उपसचिवांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होता. कारवाईदरम्यान व्यापारी व बाजार समितीच्या सुरक्षारक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. संतापलेल्या व्यापाºयांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. गाळ्यांची शटर खाली ओढण्यास सुरुवात केली. मार्केटमधील सर्व व्यवहार ठप्प झाले. कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाच्या कार्यालयामध्ये व्यापाºयांनी बैठक घेऊन अपशब्द वापरणाºयांचा निषेध केला. शेतकºयांच्या मालाला ग्राहक मिळेनासे झाले आहेत. राज्यात कुठेच जुना कांदा विकला जात नाही, यामुळे शेतकरी तो माल मुंबईला पाठवत आहेत. माल ठेवण्यासाठीही जागा नसल्यामुळे खुल्या पॅसेजमध्ये ठेवण्यात येत आहे. प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई सुरू केली असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.व्यापाºयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सहसचिव अविनाश देशपांडे, उपसचिव आय. आर. मसाराम यांनी अडत व्यापारी संघात जाऊन व्यापाºयांबरोबर चर्चा केली. मार्केटमधील समस्या सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली. मार्केटमध्ये वाहने उभी करण्याबरोबर इतर समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. देशपांडे यांनी व्यापाºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. या बैठकीला व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, माजी संचालक अशोक वाळूंज, राजिव मणियार, भरत मोरे, सुरेश शिंदे व इतर सर्व व्यापारी उपस्थित होते. व्यापाºयांची भावना लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांनही दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा वाद मिटला.>सहसचिवांमुळे वाद मिटलाकांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाºयांनी व्यापार बंद करून प्रशासनाचा निषेध केला. यामुळे मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. बंदमुळे नुकसान अजून वाढण्याची शक्यता होती. बाजार समितीचे सहसचिव अविनाश देशपांडे यांनी प्रसंगावधान राखून व्यापाºयांची समजूत घातली व त्यांच्या आवाहनानंतर व्यापाºयांनी बंद मागे घेतला व शेतकºयांचे मोठे नुकसान टळले.>बाजार समितीमध्ये कांदा-बटाट्याची आवक प्रचंड वाढली आहे. येणारा माल ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही, यामुळे काही माल पॅसेजमध्ये ठेवला जात आहे. या मालावर प्रशासनाने कारवाई केली व सुरक्षारक्षकांनी अपशब्द वापरल्यामुळे मार्केट काही वेळ बंद ठेवले होते.- राजेंद्र शेळके,अध्यक्ष,कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ>एपीएमसीमध्ये कांदा व बटाट्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. रोज २०० पेक्षा जास्त गाड्यांमधून कृषिमाल विक्रीसाठी येत असून, तो ठेवण्यासाठी जागा मिळेना झाली आहे. लिलावगृहासह गाळ्यांच्या बाहेर ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेवर गोण्या ठेवल्या जात आहेत. संपूर्ण मार्केट कांदामय झाले आहे. बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असून या मालावर कारवाई करून प्रशासनाने शेतकºयांचे नुकसान करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.