शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

भाजपच करणार शिंदे गटाचा कार्यक्रम; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 14, 2023 18:31 IST

मित्र पक्षाला पहिलं संपवायची भाजपची परंपरा असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. 

नवी मुंबई : मित्र पक्षाला पहिलं संपवायची भाजपची परंपरा आहे. त्यामुळे शिंदे गटाचा कार्यक्रम देखील भाजपच करेल असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. तसेच अयोध्येत जस पहिल्यांदाच राम जन्मला व हेच पहिल्यांदा गेल्याचे दर्शवले जात असल्याचीही टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली. घणसोली येथे फिरत्या शाखेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते प्रामुख्याने उपस्थित होते. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे घणसोली उपविभाग प्रमुख राजू गावडे, उपविभाग संघटिका शृंखला गावडे यांच्या संकल्पनेतून फिरती शाखा सुरु करण्यात आली आहे. त्याच्या लोकापर्ण प्रसंगी गुरुवारी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ठाणे जिल्ह्यात एकीकडे शाखा पळवल्या जात असताना दुसरीकडे फिरत्या शाखेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या अनोख्या शाखेचे कौतुक त्यांनी केले. मात्र शाखा पळवणाऱ्या गाडीतली शाखा पळवायला देखील कमी करणार नाहीत असा टोला देखील भास्कर जाधव यांनी कार्यक्रमप्रसंगी मारला. परंतु ज्यांच्यासोबत मैत्री करायची, त्यालाच पहिलं संपवायची भाजपची परंपरा आहे.

 त्यामुळे शिंदे गटाचा कार्यक्रम देखील भाजपच करेल असाही टोला त्यांनी मारला. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याचा दिखावा अशाप्रकारे केला, जसे तेच पहिले अयोध्येला गेलेत व त्याच दिवशी राम जन्माला आलेत अशीही टीका त्यांनी केली. सध्या सरकार पोलिसांना हाताशी धरून शिवसेनेच्या शाखा बळकावत आहेत, खोटे गुन्हे दाखल करत आहेत, धनुष्य चोरत आहेत. मात्र शिवैनिकांचे विचार कसे चोरणारा असेही त्यांनी फटकारले. भाजप विरोधात राज्यात सर्व पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही निवडणुका लागल्या तरी जनता भाजपला व शिंदे गटाला घरी बसवणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सत्तेत असताना भाजपने काँग्रेसच्या नेत्यांवर टोकाची टिका करूनही काँग्रेसने सुडाचं राजकारण केलं नाही. मात्र भाजप सत्तेत येताच खरे आरोप केले तरी खोटे गुन्हे दाखल होतात अशी टिका करून त्यांनी अप्रत्यक्ष राहुल गांधींवरील कारवाईची खंत व्यक्त केली. 

याप्रसंगी खासदार राजन विचारे यांनी देखील सरकारच्या कट कारस्थानांवर संताप व्यक्त करत ठाणेत जिथे जिथे शाखा बळकावल्या गेल्या, तिथे नव्या शाखा तयार झाल्याने शाखा बळकावायचेच प्रयत्न त्यांनी सोडून दिल्याचेही सांगितले. कार्य्रक्रमास जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, माजी नगरसेवक मनोहर मढवी, मनोज हळदणकर, प्रवीण म्हात्रे शुभांगी रावखंडे, राजू गावडे, शृंखला गावडे, आत्माराम सणस आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे