शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

मजुरांचे स्थलांतर पडले पथ्यावर; नवी मुंबई महापालिकेचा ६० टक्के भार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:52 AM

निवारा केंद्रातील आश्रितांची संख्याही घटली

- नामदेव मोरेनवी मुंबई : परराज्यातील मजुरांचे स्थलांतर नवी मुंबई महापालिकेच्या पथ्यावर पडले आहे. एक महिन्यापूर्वी मनपाला प्रतिदिन ३७ हजार बेघरांना जेवण पुरवावे लागत होते. सद्य:स्थितीमध्ये हा आकडा १५ हजारांवर आला आहे. मनपाच्या निवारा केंद्रातील संख्या ३६० वरून ४१ झाली आहे.

शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे हजारो मजूर व परराज्यातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. कारखाने बंद झाल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला व निवासाची जागाही सोडावी लागली होती. हॉटेलसह खानावळ बंद झाल्याने जेवण करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मजुरांनी टेम्पो, ट्रकमधून गावाकडे जाण्याचा प्रयत्न केला; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. या वेळी मजुरांना महापालिकेच्या निवारा केंद्रात पाठविण्यास सुरुवात झाली. निवारा केंद्रातील व शहरातील बेघरांना जेवण पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर होती.

नवी मुंबई पालिकेने शहरात १८ निवारा केंद्रांचे नियोजन केले. त्यापैकी ६ प्रत्यक्षात सुरू केली. यामध्ये ३६० जणांना आश्रय दिला होता. या सर्वांना चहा, जेवण, नाश्ता मनपाच्या वतीने दिला जात होता. शासनाने परराज्यातील मजुरांना गावी पाठविण्यास सुरुवात केल्यानंतर मनपाच्या केंद्रामधील जवळपास ३३९ जण गावी गेले आहेत. सद्य:स्थितीमध्ये मनपाच्या तीन केंद्रांमध्ये फक्त ४१ जण वास्तव्य करत आहेत. यामध्ये बेलापूरमध्ये २३, नेरूळमध्ये ७ व घणसोलीमध्ये १२ जणांचा समावेश आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रुग्णालय तयार केले जात असल्यामुळे तेथील निवारा केंद्र बंद केले आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पालिका हद्दीत रोज ३५ ते ४० हजार मजूर, बेघर व गरिबांना अन्नपुरवठा केला जात होता. मनपाच्या १५ कम्युनिटी किचनद्वारे व सामाजिक संस्थांच्या मदतीने हे अन्नदान केले जात होते. २८ एप्रिलला ३७,२४० जणांना जेवण दिले होते. एक महिन्यात मोठ्या संख्येने मजूर गावी गेल्यामुळे २७ मे रोजी फक्त १५,०७२ जणांना जेवण पुरवावे लागले. जवळपास ६० टक्के भार कमी झाला आहे. याशिवाय रस्ते, उड्डाणपुलाखाली, मोकळ्या जागांवर हजारो मजूर वास्तव्य करत होते, त्यांची संख्याही कमी झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.

दाटीवाटीत राहत होते मजूर

परराज्यातील मजूर छोट्या खोलीत व कारखान्यात दाटीवाटीने राहत होते. उड्डाणपुलाखाली, रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी आश्रय घेतला होता. सार्वजनिक प्रसाधनगृह व अनेक ठिकाणी उघड्यावर प्रातर्विधी केला जात असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते. स्थलांतरामुळे मनपावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

एपीएमसीतील मजुरांचेही स्थलांतर

एपीएमसीतील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये परराज्यातील कामगारांनी आश्रय घेतला होता. त्यांच्यामुळे मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या महिनाभरात अनेकांनी गावी पलायन केले. ट्रक व टेम्पोतूनही अनेक जण गावी गेले. यामुळे मार्केटवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

महिनाभराचा तपशील प्रकार

२७ मे २८ एप्रिल शहरातील निवारा केंद्रे १८ १८ कार्यान्वित निवारा केंद्रे ३ ६निवारा केंद्रातील आश्रित ४१ ३६०

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस