शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अग्निसुरक्षेविषयी एमआयडीसी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:46 IST

कंपन्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद : रबाळेसह नेरुळ अग्निशमन दलाला तपासणीचे अधिकारही नाहीत

नामदेव मोरे ।नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आगीचे सत्र सुरू आहे. आगीच्या घटना थांबविण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रबाळे व नेरुळमध्ये अग्निशमन केंद्रे सुरू केली असून, त्यांना फायर आॅडिटचे अधिकारही नाहीत. कोणत्या कंपन्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुरू आहे व कुठे बंद याचीही माहितीही उपलब्ध नाही. एमआयडीसी मुख्यालयाने सुरक्षेकडे डोळेझाक करायची व आग लागली की जवानांनी जीव धोक्यात घालून ती विझवायची एवढेच काम सुरू असून, अशीच स्थिती राहिली तर भविष्यात भीषण दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एमआयडीसीमध्ये २००६मध्ये सावला कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागली. एक आठवडा सुरू असलेल्या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यानंतरची ही सर्वात भीषण आग होती. या घटनेनंतर एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अग्निशमन नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्या दुर्घटनेला १२ वर्षे पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी ५० ते ६० आगीच्या घटना होऊनही एमआयडीसी प्रशासनाने अद्याप या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यामुळेच खैरणे एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकाच वेळी चार कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आग विझविण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे परिसरामधून १५ बंब घटनास्थही हजर होेते; परंतु या बंबांसाठी पटकन पाणी उपलब्ध करून देणारी यंत्रणाच नव्हती. यामुळे बंब असून पाणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. ज्या चार कंपन्यांमध्ये आग लागली तेथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होती का? याविषयीही शंका उपस्थित केली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ ते १४ तास घटनास्थळी ठाण मांडून आग विझविली. या दुर्घटनेनंतर एमआयडीसीमधील किती कंपन्यांचे फायर आॅडिट झाले आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता कोणत्याच कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्याचे लक्षात आले.एमआयडीसीमध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त उद्योग आहेत. रिलायन्स, एच. पी. इंडियन आॅइल यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांची कार्यालयेही येथे आहेत. देशातील सर्वात जास्त केमिकल कंपन्याही येथे आहेत. रिलायन्स सारख्या काही कंपन्यांची स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे; परंतु इतर कंपन्यांमध्ये अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नाहीत. आग लागल्यास अग्निशमन बंबांना पाणी भरण्यासाठीची यंत्रणाही नाही. सर्वत्र अस्ताव्यस्तपणे साहित्य ठेवलेले असते. यामुळे आग लागल्यानंतर तत्काळ पूर्ण कंपनी जळून खाक होत आहे. अग्निशमन जवानांवर आग विझविण्याची जबाबदारी आहे; पण नियमांचे पालन न करणाºयांवर कारवाई करण्याचे काहीच अधिकार अग्निशमन कार्यालयांना नसल्याने दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे.जानेवारी २०१७ पासूनच्या महत्त्वाच्या घटना३ मार्च २०१७ : पावणे एमआयडीसीत पॉलिकॅब कंपनीला भीषण आग. कोट्यवधी रुपयांचे नुकसान९ सप्टेंबर २०१७ : साकेत इंडस्ट्रीज या रंग बनविण्याच्या कंपनीला आग, दोन जण किरकोळ जखमी१७ आॅक्टोबर २०१७ : तुर्भेमधील मॅकॅन्को केमिकल कंपनीमध्ये वेल्डिंगची ठिणगी पडून भीषण आग, पूर्ण कंपनी जळून खाक३० आॅक्टोबर २०१७ : धिरूभाई अंबानी नॉलेज सिटीमधील रुग्णालयाच्या इमारतीला आग३ नोव्हेंबर २०१७ : पावणेमधील प्रियंका गारमेंट कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान१० डिसेंबर २०१७ : महापेमधील स्टॉक होल्डिंग इमारतीला आग, १४ दिवस सुरू असलेल्या आगीमध्ये अनेक सरकारी कार्यालयांमधील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली१७ डिसेंबर २०१७ : तुर्भेमधील मोडेप्रो कंपनीला आग, स्फोटामुळे पाच किलोमीटर परिसर हादरला११ फेब्रुवारी २०१८ : तुर्भेमधील प्रिसीज कंपनीमध्ये आग२५ फेब्रुवारी २०१८ : पावणेमधील सिंडिकेट वायफर ब्लेड बनविणाºया कंपनीला भीषण आग, दोन मजल्यांवरील साहित्य खाक१४ मार्च २०१८ : रबाळे एमआयडीसीतीलअँथोनी गॅरेजला आग, चार बस जळून खाक

टॅग्स :fireआग