शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

म्हात्रे-नाहटा वाद युतीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:47 PM

शिवसेनेतही गटबाजी, राजन विचारेंची होणार कसरत; आनंद परांजपेंची नाईक कुटुंबीयांवर मदार

- कमलाकर कांबळेठाणे लोकसभा क्षेत्रात सहापैकी विधानसभेचे ऐरोली आणि बेलापूर हे दोन मतदारसंघ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोडतात. या दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीचा बोलबोला असला, तरी मोदीलाटेत बेलापूरचा किल्ला मात्र भाजपाने सर केला. निवडणुकीच्या ऐन तोंडावर कार्यकर्त्यांचे कोणतेही पाठबळ नसताना भाजपात डेरेदाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. असे असले तरी नाहटा यांना मिळालेल्या मतांच्या आधारे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे गणित मांडले, तर राजन विचारे यांना मतांची आघाडी सोपी वाटते. परंतु, आमदार मंदा म्हात्रे आणि विजय नाहटा यांच्यातील वाद युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या मुळावर बेतण्याची शक्यता आहे.लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून तब्बल २५ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर, लगेच झालेल्या परंतु सेना व भाजपाने स्वतंत्र लढलेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ मते पडली होती, तर नाईक यांच्यापेक्षा अवघ्या दीड हजार मताधिक्यांनी विजयी झालेल्या मंदा म्हात्रे यांना ५५,३१६ इतकी मते मिळाली होती. आता या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती आहे. त्यामुळे सेना आणि भाजपाची एकगठ्ठा मते मिळाल्यास विचारे यांचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र, आमदार म्हात्रे आणि नाहटा यांच्यातील वादाचा फटका विचारे यांना बसण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या ईटीसी केंद्राच्या चौकशीच्या मुद्यावरून मंदा म्हात्रे व नाहटा यांच्यात बेबनाव निर्माण झाला. तो आजतागायत कायम आहे. विशेष म्हणजे या वादात विचारे यांनी नाहटा यांना झुकते माप दिल्याने म्हात्रे त्यांच्यावर नाराज आहेत. शिवाय, नाहटा यांनी मागील वर्षभरापासून पुन्हा बेलापूरमधून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक कामांच्या श्रेयावरून युतीच्या या दोन नेत्यांत संघर्षमय स्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षाची झळ विचारे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेलापूर क्षेत्रात भाजपाचे केवळ चार नगरसेवक आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हे महापालिकेचे नगरसेवक आहेत. मागील चार वर्षांत पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. मंदा म्हात्रे यांनी वैयक्तिक पातळीवर आपला मतदारसंघ हलता ठेवला आहे. त्याचा विचारे यांना किती फायदा होईल, हे काळच ठरवेल. शिवसेनेची अवस्थासुद्धा फारशी वेगळी नाही. शिवसेनेचे उभे दोन गट पडले आहेत. एका गटाचे नेतृत्व विजय नाहटा यांच्याकडे आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रात सेनेचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी नाहटा यांना मानणारे किती नगरसेवक आहेत, याबाबतसुद्धा संभ्रम आहे. म्हात्रे व नाहटा यांच्यातील वाद, शिवसेनेतील गटबाजी, त्यामुळे कार्यकर्त्यांत निर्माण झालेला संभ्रम अशा परिस्थितीत बेलापूरमधून मतांची आघाडी घेताना विचारे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.लोकसभेच्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचे राजकीयस्तरावर वेगळे महत्त्व आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपात दाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. पराभव निसटता असला, तरी तो नाईकांच्या जिव्हारी लागला. याचा परिणाम म्हणून मागील साडेचार वर्षे नाईक यांनी बेलापूर मतदारसंघाकडे पाठ फिरवली. महापालिका निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले. त्यानंतर, मात्र त्यांचा सर्वसामान्यांबरोबरच संवाद संपला. गाठीभेटींना पूर्णविराम मिळाला. परिणामी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यांना भेटायचे किंवा बोलायचे असेल, तर आजही पहिल्यांदा पांडुरंगाचा धावा करावा लागतो. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची सर्व मदार नाईक कुटुंबीयांवर आहे. ही वस्तुस्थिती असली, तरी विद्यमान परिस्थितीत परांजपे यांना बेलापूर विधानसभा क्षेत्रात मतांचा जोगवा मागताना घाम गाळावा लागणार आहे.काँग्रेसची भूमिका महत्त्वाचीविधानसभेच्या बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे २८, तर काँग्रेसचे सात नगरसेवक आहे. शिवाय,महापालिकेतील सत्तेत काँग्रेस भागीदार आहे. काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळल्यास परांजपे यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.मतदारांत नाराजीराजन विचारे यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात बेलापूर विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही नव्या योजना राबवल्या नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमालासुद्धा फारसे फिरकले नाहीत. याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.मागील निवडणुकीतील मतांचा गोषवारालोकसभेच्या मागील निवडणुकीत राजन विजारे यांना बेलापूर मतदारसंघातून ९०,९८६ मते पडली होती, तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना ६५,२०२ मतांवर समाधान मानावे लागले होते. या मतदारसंघातून विचारे यांनी २५,७८४ मतांची आघाडी घेतली होती. याच मतदारसंघातून आपच्या उमेदवाराला जवळपास साडेआठ हजार मते मिळाली होती, तर मनसेचे अभिजित पानसे यांना ५४१८ मते पडली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना