शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

शेतक-यांना माथाडींचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांनी केले कष्टकरी कामगारांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 3:01 AM

राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

नवी मुंबई : राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे स्वागत केले असून, ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.राज्यातील असंघटित हमाल व कष्टकरी कामगारांना एकत्र आणून त्यांच्यासाठी कायदा बनविण्यास सरकारला भाग पाडण्यामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची महत्त्वाची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील यांनी राज्यातील माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. कामगारांना घरे व उपचारासाठी स्वत:चे रुग्णालय सुरू करण्यात आले. राज्यातील माथाडी कामगारांनीही त्यांना मिळालेल्या कष्टाच्या मोबदल्यातील काही वाटा संकटग्रस्तांना देण्याची परंपरा कायम राखली आहे. राज्यात भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ व इतर कोणतेही नैसर्गिक संकट असले की, सर्वात प्रथम धावून जातो तो माथाडी कामगारच. मुंबईतील १९९३मधील बॉम्बस्फोटानंतर सर्वप्रथम जनजीवन सुरळीत करण्यामध्येही माथाडी कामगारांचा मोठा वाटा होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनीही माथाडींमुळेच दुसºया दिवशी जनजीवन सुरळीत झाल्याचे अनेक वेळा भाषणांमध्ये सांगितले आहे. कामगारांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकºयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकºयांना मदत करता यावी, यासाठी कामगारांनी एक दिवसाचे वेतन दिले आहे. ३० लाख रुपयांचा निधी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.माथाडी कामगारांनी केलेल्या मदतीचे मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले आहे. कष्टकरी कामगारांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी देणे ही इतरांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. अशाप्रकारे प्रत्येक नागरिकाने मदतीचा हात पुढे केला, तर प्रत्येक संकटग्रस्तांना आधार देणे सहज शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.माथाडी नेत्यांनीही कामगारांनी आतापर्यंत सामाजिक जाणिवेमधून काय केले, याविषयी माहिती दिली. माथाडी कामगारही शेतकरीच असून, बहुतांश कामगार शेती व्यवसायाशी संबंधित उद्योगामध्ये कार्यरत आहेत. यामुळेच शेतकºयांच्या मदतीसाठी कामगार नेहमीच पुढे येत असल्याचे सांगितले.या वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, गुलाबराव जगताप, एकनाथ जाधव, गुंगा पाटील, पोपटराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.>कामगारांना २५०० घरांचे आश्वासनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरामध्ये माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. वडाळा येथील गृहप्रकल्प पूर्ण होण्यामधील अनेक अडथळे दूर केले आहेत. याशिवाय अजून २५०० घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. वडाळामधील गृहप्रकल्पांसाठी जादा चटईक्षेत्र देता येईल का, याविषयी चाचपणी करण्यात येणार आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, शक्य तितक्या लवकर घरांसह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले असल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.माथाडी कामगारांनी राज्यातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकºयांसाठी एका दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामगारांनी दिलेला ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.- नरेंद्र पाटील,माथाडी नेते