शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:05 IST

आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत

-नामदेव मोरेनवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ ला विधानभवनावर भव्य मोर्चा काढला होता. आरक्षण दिले नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही आणि अण्णासाहेबांनी आरक्षणासाठीचे पहिले बलिदान दिले. तेव्हापासून ४२ वर्षे माथाडी कामगार आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी लढा देत असून, आताच्या लढ्यात आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे. 

मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलकांच्या मुक्कामाची सोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली होती. आंदोलकांच्या स्वागतासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० हजारपेक्षा जास्त माथाडी कामगार दोन दिवसांपासून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. आरक्षणाच्या लढ्याशी माथाडी कामगारांचे भावनिक नाते आहे. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्वप्रथम आरक्षणाची मागणी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २२ मार्च १९८२ला विधिमंडळावर मोर्चा काढला होता. एक लाखापेक्षा जास्त कामगार मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

माथाडी नेत्यांचीही महत्त्वाची भूमिका 

आंदोलकांना राहण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बाजार समिती, महानगरपालिका, पोलिस प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन आंदोलकांना पाणी, जेवण, शौचालय या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. दोन दिवस मार्केटमध्ये थांबून तयारीवर लक्ष देत होते. अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माथाडी कामगारांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनीच लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

‘तो’ सर्वांत धक्कादायक क्षण 

मोर्चाला संबोधित करताना सरकारने आजच आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता. सरकारने काहीच निर्णय घेतला नाही, यामुळे २३ मार्चला सूर्योदयापूर्वी त्यांनी बलिदान दिले. माथाडी कामगारांना व मराठा चळवळीसाठी तो सर्वांत धक्कादायक क्षण होता. तेव्हापासून मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात माथाडी कामगार सक्रियपणे सहभागी होत आहेत. माथाडी नेते  नरेंद्र पाटील हेही लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लढ्यातही माथाडी कामगार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. चाळीस वर्षांपूर्वी कोयना खोऱ्यातील पठ्ठ्याने आरक्षणाची चळवळ सुरू केली. आता गोदा पट्ट्यातील मनोज जरांगे यांनी हा लढा निर्णायक टप्प्यावर नेऊन ठेवल्याचा संदेश कामगारांमध्ये फिरत आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबई