शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बाजार समितीमध्ये कचरा घोटाळा!; कचऱ्यातील भाजीपाल्याचा तबेल्यांना पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:11 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये कोबी, फ्लॉवर व इतर भाजीपाल्याच्या कचºयातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. एपीएमसीच्या परवानगीशिवाय वर्षानुवर्षे तबेल्यांसाठी चारा पुरविला जात आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये कोबी, फ्लॉवर व इतर भाजीपाल्याच्या कचºयातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. एपीएमसीच्या परवानगीशिवाय वर्षानुवर्षे तबेल्यांसाठी चारा पुरविला जात आहे. आवाज उठवेल त्याच्याशी अर्थपूर्ण संधान बांधून हा प्रकार सुरू असून, प्रशासनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण होत असतो. भाजी मार्केटमध्ये खराब झालेला माल व कोबी, फ्लॉवरच्या पाल्याचे प्रमाण जास्त आहे. ओल्या कचºयातून खतनिर्मिती व वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प रखडल्यामुळे रोज ५० ते ६० टन कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जात आहे. वास्तविक भाजी मार्केटमधील कोबी,फ्लॉवरच्या पाल्याला कल्याणसह मुंबईमधील तबेले चालकांकडून मोठी मागणी आहे. रोज सकाळी तीन मोठ्या ट्रकमधून हा कचरा तबेल्यांकडे नेला जात आहे. वास्तविक बाजार समितीच्या नियमाप्रमाणे परवाना नसलेल्या ट्रक किंवा टेंपोला मार्केटमध्ये प्रवेश नाही. पाला वाहतुकीचा परवाना कोणालाही दिलेला नसताना वर्षानुवर्षे रोज १० ते २० टन ओला कचरा फुकट उचलला जात आहे. हा कचरा १ ते २ रुपये किलो दराने तबेले चालकांना विकून लाखो रुपयांची कमाई केली जात आहे. भाजी मार्केटमध्ये टेंपो व ट्रकमध्ये हा कचरा भरून बाजार समितीच्या काट्यावरच त्याचे वजन केले जात आहे. कचºयाचा घोटाळा सुरू असून, बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असूनही त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही.भाजी मार्केटमधील कचºयातही अनेकांचे अर्थपूर्ण हितसंबंध दडलेले आहेत. यापूर्वी एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्या व्यक्तीला या कचºयाच्या बदल्यात ५० हजार रुपये महिना दिले जात होते; परंतु त्याची माल घेऊन जाणाºयांशी झालेली भांडणे व पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्याला दिला जाणारा मोबदला कमी करण्यात आला आहे. आतापर्यंत जो आवाज उठवेल त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे १५ ते २५ हजार रुपये देऊन गप्प केले जात आहे. या कचºयाचा मोबदला कोणाला किती दिला जातो, याविषयी मार्केटमध्ये उघडपणे चर्चा केली जाते.काही वर्षांपूर्वी पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण गेले व त्यामध्ये अनेकांनी स्वत:चा अर्थपूर्ण हेतू साध्य करून घेतला होता. ज्याचा मार्केटशी काहीही संबंध नाही ते कचºयातून कमाई करत आहेत; पण बाजार समितीने मात्र याकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. ज्यांना यामधील अर्थकारण माहिती आहे त्यांनी हा कचरा आहे, फुकट घेऊन गेल्यामुळे बाजार समितीचाच फायदा असल्याचे पटवून देण्यामध्ये बुद्धी खर्ची घातली आहे.कचºयातील भाजी, फळे मार्केटमध्ये विक्रीलाभाजी व फळ मार्केटमध्ये खराब माल कचºयामध्ये फेकून दिला जातो. परप्रांतीय कामगार व काही महिला कचºयातून भाजीपाला व फळे वेचून तो सानपाडा स्टेशन, फळ मार्केटसमोरील पदपथ व इतर ठिकाणी त्याची विक्री करत आहेत. खराब मालामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लिलाव करावाएपीएमसीमधून तबेल्यांना ओला कचरा पुरविण्यामध्ये मोठा अर्थमय व्यवहार सुरू असून तो तत्काळ थांबविण्यात यावा. तबेल्यांसाठी माल घेऊन जायचा असेल तर त्याचा लिलाव करावा किंवा निविदा काढून ठेका देण्यात यावा. विनापरवाना वाहतूक करणाºयांना मार्केटमध्ये येण्यास बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती