शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

नवी मुंबई जगाच्या नकाशावर, पाच वर्षांत ६० हजार कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:54 IST

देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे

नामदेव मोरे नवी मुंबई : देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. देशातील प्रमुख बंदर, तीन औद्योगिक वसाहती, प्रस्तावित २३ स्मार्ट सिटीमुळे नवी मुंबईचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. देशातील सर्वात मोठा औद्योगिक बेल्ट होण्याचा बहुमान प्राप्त होणार आहे.दोन दशकांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१९मध्ये पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत नवी मुंबई परिसरातील जल, रस्ते व हवाई वाहतुकीची सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे नवी मुंबई परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. मुंबईनंतर सर्वात मोठी औद्योगिक नगरी म्हणून या परिसराची ओळख निर्माण होऊ लागली आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तळोजा, रसायनी एमआयडीसी व जेएनपीटी बंदरामुळे यापूर्वीच औद्योगिकदृष्ट्या या परिसराला महत्त्व प्राप्त झाले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विकासाची व्याप्ती खोपोली ते पेणपर्यंत पोहोचणार आहे. विमानतळाच्या २५ किलोमीटर परिसर विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) म्हणून घोषित केला आहे. या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. या परिसरात २३ स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहेत. जेएनपीटीच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचे कामही पूर्ण झाले आहे. भविष्यात न्हावा शेवा सी लिंक, कोपरखैरणे-विक्रोळी मार्ग, सायन-पनवेल महामार्गावर नवीन उड्डाणपूल व मुंबई-गोवा महामार्गाचे विस्तारीकरण यामुळे देशातील सर्वात चांगली वाहतूक व्यवस्था असणारे शहर म्हणून पनवेल व नवी मुंबईची ओळख निर्माण होणार आहे.हवाई, जल व महामार्गांचे जाळे निर्माण होणार असल्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. पाच वर्षांत तब्बल ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये विमानतळाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या कामाचा समावेश असणार आहे. जेएनपीटी विस्तारीकरणासाठी १० हजार ७०० कोटी, नैना परिसरामध्ये ४ हजार कोटी, महामार्ग विस्तारीकरणासाठी १३ हजार कोटी, सिडको पायाभूत सुविधांसाठी तब्बल ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय खासगी विकासकांकडून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

विमानतळाच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पेनोव्हेंबर १९९७नागरी उड्डाण मंत्रालयाने मुंबईला पर्यायी विमानतळ उभारण्यासाठी जागांची पाहणी सुरू केली.जून २०००भारत सरकारने रेवस-मांडवा येथे एक रनवेसाठी विमानतळाची जागा प्रस्तावित केली.नोव्हेंबर २००१एअरपोर्ट अथॉरिटी आॅफ इंडियाने नवी मुंबईच्या जागेची पाहणी केली व सिडकोला तांत्रिक व आर्थिक सर्वेक्षणास (टीईएफएस) सांगितले.फेब्रुवारी २००७सिडको व महाराष्ट्र सरकारने विमानतळ प्रकल्पाविषयी अभ्यास अहवाल सादर केला.जुलै २००७नागरी उड्डयन मंत्रालयाने एमएमआरडीए परिसरामध्ये दुसरे विमानतळ नवी मुंबईमध्ये उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला.आॅगस्ट २००७नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सिडको बोर्ड मिटिंगमध्ये मंजूर केला.सप्टेंबर २००७सिडकोने पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी आयआयटी मुंबई ची नियुक्ती केली.नोव्हेंबर २००७नॅशनल कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने (एनसीझेडएमए) कोस्टल झोन परिसरामध्ये नवी मुंबई विमानतळ उभारण्यासाठी नियमात दुरुस्ती करून परवानगी दिली.मार्च २००८सिडकोने अमेरिकेतील लुईस बर्गर कंपनीला मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले.जुलै २००८महाराष्ट्र शासनाने विमानतळ उभारण्याचा प्रस्तव मंजूर करून सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली.फेब्रुवारी २००९नागरी उड्डयन मंत्रालयाने सीआरझेड नियमाविषयी उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याच्या सूचना सिडको व राज्य शासनास दिल्या.एप्रिल २००९उच्च न्यायालयाने सीआरझेड विषयी सिडको व राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र स्वीकारले.मे २००९नागरी उड्डयन मंत्रालयाने ग्रीनफिल्ड विमानतळासाठी अधिसूचना काढली.डिसेंबर २००९नागरी उड्डयन मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने विमानतळ परिसराची पाहणी केली.मार्च २०१०सिडकोने पर्यावरण अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना व हरकती मागविण्यासाठी सादर केला.मे २०१०प्रदूषण नियंत्रण मंत्रालयाने सूचना व हरकती मागविल्या.जून २०१०सिडकोने अंतिम पर्यावरण अहवाल सादर केला.जुलै २०१०एमसीझेडएच्या ६३व्या मिटिंगमध्ये कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनमध्ये किरकोळ दुरुस्ती करण्यात आली.आॅक्टोबर २०१०संरक्षण मंत्रालयाने विमानतळासाठीची परवानगी दिली.नोव्हेंबर २०१०नागरी उड्डयन मंत्रालयाने पर्यावरण व सीआरझेड परवानगी दिली.