शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Maharashtra Floods : पनवेलमधील शासकीय अधिकाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 13:43 IST

कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दहा लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे.

वैभव गायकर 

पनवेल - कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. रविवारी (11 ऑगस्ट) मदतीसाठी गोळा केलेली सामुग्री ट्रकद्वारे पनवेलमधून कोल्हापूरला रवाना करण्यात आली आहे. 

कोल्हापूरकडे पाठवण्यात आलेल्या सामुग्रीमध्ये एक लाख पाण्याच्या बॉटल्स ,पाच हजार सॅनेटरी नॅपकीन, सात हजार माऊथ मास्क, फरसाण - बिस्किटे, खाद्य, कपडे आदींसह विविध जीवनावशक्यक वस्तूचा समावेश आहे. अवघ्या चार दिवसात या शासकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दहा लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. सांगलीवरून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता बंद असल्याने सुरुवातीला हे साहित्य सांगली येथे जाईल त्यानंतर मार्ग मोकळा झाल्यानंतर हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार आहे.

रविवारी सकाळी हे साहित्य ट्रकद्वारे रवाना करण्यात आले आहे. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, तहसीलदार अमित सानप, शहर अभियंता संजय कटेकर आदींसह महसूल, महानगर पालिका, पोलीस, परिवहन आदी विभागातील कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.  

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSatara Floodसातारा पूरSangli Floodसांगली पूरpanvelपनवेल