शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

Maharashtra Floods : पनवेलमधील शासकीय अधिकाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 13:43 IST

कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दहा लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे.

वैभव गायकर 

पनवेल - कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. रविवारी (11 ऑगस्ट) मदतीसाठी गोळा केलेली सामुग्री ट्रकद्वारे पनवेलमधून कोल्हापूरला रवाना करण्यात आली आहे. 

कोल्हापूरकडे पाठवण्यात आलेल्या सामुग्रीमध्ये एक लाख पाण्याच्या बॉटल्स ,पाच हजार सॅनेटरी नॅपकीन, सात हजार माऊथ मास्क, फरसाण - बिस्किटे, खाद्य, कपडे आदींसह विविध जीवनावशक्यक वस्तूचा समावेश आहे. अवघ्या चार दिवसात या शासकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दहा लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. सांगलीवरून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता बंद असल्याने सुरुवातीला हे साहित्य सांगली येथे जाईल त्यानंतर मार्ग मोकळा झाल्यानंतर हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार आहे.

रविवारी सकाळी हे साहित्य ट्रकद्वारे रवाना करण्यात आले आहे. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, तहसीलदार अमित सानप, शहर अभियंता संजय कटेकर आदींसह महसूल, महानगर पालिका, पोलीस, परिवहन आदी विभागातील कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.  

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSatara Floodसातारा पूरSangli Floodसांगली पूरpanvelपनवेल