शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Floods : पनवेलमधील शासकीय अधिकाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 13:43 IST

कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दहा लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे.

वैभव गायकर 

पनवेल - कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. रविवारी (11 ऑगस्ट) मदतीसाठी गोळा केलेली सामुग्री ट्रकद्वारे पनवेलमधून कोल्हापूरला रवाना करण्यात आली आहे. 

कोल्हापूरकडे पाठवण्यात आलेल्या सामुग्रीमध्ये एक लाख पाण्याच्या बॉटल्स ,पाच हजार सॅनेटरी नॅपकीन, सात हजार माऊथ मास्क, फरसाण - बिस्किटे, खाद्य, कपडे आदींसह विविध जीवनावशक्यक वस्तूचा समावेश आहे. अवघ्या चार दिवसात या शासकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दहा लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. सांगलीवरून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता बंद असल्याने सुरुवातीला हे साहित्य सांगली येथे जाईल त्यानंतर मार्ग मोकळा झाल्यानंतर हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार आहे.

रविवारी सकाळी हे साहित्य ट्रकद्वारे रवाना करण्यात आले आहे. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, तहसीलदार अमित सानप, शहर अभियंता संजय कटेकर आदींसह महसूल, महानगर पालिका, पोलीस, परिवहन आदी विभागातील कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.  

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSatara Floodसातारा पूरSangli Floodसांगली पूरpanvelपनवेल