शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

बालेकिल्ला टिकवण्यात गणेश नाईक यांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:07 IST

Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीसह मनसेच्या नवख्या उमेदवारांची मतेही लक्षवेधी

नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघामध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांनी ७८ हजार ४९१ मतांनी विजय मिळविला आहे. बालेकिल्ला टिकविण्यात नाईक परिवारास यश आले असले, तरी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या उमेदवारांनी मिळविलेली मतेही लक्षवेधी ठरली आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या मतदारसंघामध्ये ऐरोलीचाही समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली; परंतु बेलापूरमधून गणेश नाईकांना उमदेवारी दिली नाही, यामुळे वडिलांसाठी संदीप नाईक यांनी त्यांची उमेदवारी सोडली.

राष्ट्रवादी काँगे्रसला तुल्यबळ उमेदवार मिळाला नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी असलेले गणेश शिंदे यांना उमेदवारी दिली. मनसेने अखेरच्या क्षणी नीलेश बाणखेले यांना उमेदवारी दिली. नाईकांच्या तुलनेमध्ये सर्व उमेदवार कमकुवत वाटत होते. मतदारांमध्येही यंदा निरुत्साह दिसला असून फक्त ४२ टक्के मतदान झाले होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गणेश नाईक यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांना एकूण एक लाख १४ हजार ६४५ मते मिळाली. राष्ट्रवादी काँगे्रसचे गणेश शिंदे यांना ३६ हजार १५४ मते मिळाली. मनसेला २२ हजार ८१८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी व मनसेचे उमेदवार नवखे असूनही त्यांनी चांगली मते मिळविली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश ढोकणे यांनीही तब्बल १३ हजार ४२४ मते मिळविली आहेत. मतदारांचे स्थलांतर झाले नसते तर अजून कडवे आव्हान भाजपला मिळाले असते, अशी चर्चा सुरू झाली होती.

ऐरोलीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळविल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. बेलापूर मतदारसंघामधील अनेक पदाधिकारीही जल्लोषात सहभागी झाले होते. २०१४ मध्ये निसटता पराभव झाल्याचे शल्य नाईक समर्थकांमध्ये होते. या वेळच्या निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळाल्याने ढोल-ताशे वाजवून पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. माझी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माझी महापौर सागर नाईक, नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय विकासकामे केली आहेत, यामुळे राज्यातील जनतेने विश्वास दाखवून निवडून दिले आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील.- गणेश नाईक,विजयी उमेदवार, ऐरोली

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019airoli-acऐरोलीBJPभाजपा