शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

महामुंबईच्या मुली हुशार, गेल्या वर्षीच्या निकालामध्ये यंदा वाढ; नवी मुंबईचा निकाल ९३.७० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:15 IST

पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईमधील १५,७३७ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यामधील ८६ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. १५,६४९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी १४,६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहराचा एकूण निकाल ९३.७० टक्के लागला आहे. पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात मुलींनी मारली बाजीठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९४.०७ टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा निकाल ९०.२३ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात एकूण ८९ हजार ९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये ४४ हजार २८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ४५ हजार ६५५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण ९८ हजार २ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५० हजार ७७५ मुले आणि ४७ हजार २२७ मुलींचा समावेश होता. यापैकी ९७ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ५० हजार ५९३ मुले आणि ४७,०६९ मुलींनी परीक्षा दिली होती.

रायगडमध्येही मुलींचाच बोलबाला- अलिबाग : उच्च माध्यमिक बारावी परीक्षेत रायगड विभागाचा निकाल ९४.८३ टक्के लागला आहे. गतवर्षापेक्षा यंदा निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात ९२.७१ टक्के मुले, तर ९७.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

- पंधरा तालुक्यातील १४ हजार ९३६ मुले, तर १४ हजार ५३२ मुली असे एकूण २९ हजार ४६८ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी १४ हजार ८६० मुले, तर १४ हजार ४८६ मुली असे एकूण २९ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. १३ हजार ७७८ मुले, तर १४ हजार ५३ मुली असे एकूण २७ हजार ८३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात विज्ञान शाखेचा ९८.७४ टक्के, कला शाखेचा ८५.७२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा ९५.२२ टक्के निकाल लागला आहे.

 पालघरमध्ये वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक पालघर : पालघर जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.५१ टक्के लागला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलींनी यंदाही बाजी (९५.१५ टक्के) मारीत मुलांना (९२.१३ टक्के) मागे टाकले आहे. सर्वाधिक निकाल वसई तालुक्याचा (९५.४४ टक्के) तर सर्वात कमी निकाल डहाणू तालुक्याचा (८७.५१ टक्के) लागला आहे. जिल्ह्यात एकूण २७,२५९ मुलांपैकी २५,११६ मुले उत्तीर्ण झाली असून, २२,९५५ मुलींपैकी २१,८४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातून ५०,३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी