शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महामुंबईच्या मुली हुशार, गेल्या वर्षीच्या निकालामध्ये यंदा वाढ; नवी मुंबईचा निकाल ९३.७० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:15 IST

पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईमधील १५,७३७ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यामधील ८६ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. १५,६४९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी १४,६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहराचा एकूण निकाल ९३.७० टक्के लागला आहे. पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात मुलींनी मारली बाजीठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९४.०७ टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा निकाल ९०.२३ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात एकूण ८९ हजार ९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये ४४ हजार २८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ४५ हजार ६५५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण ९८ हजार २ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५० हजार ७७५ मुले आणि ४७ हजार २२७ मुलींचा समावेश होता. यापैकी ९७ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ५० हजार ५९३ मुले आणि ४७,०६९ मुलींनी परीक्षा दिली होती.

रायगडमध्येही मुलींचाच बोलबाला- अलिबाग : उच्च माध्यमिक बारावी परीक्षेत रायगड विभागाचा निकाल ९४.८३ टक्के लागला आहे. गतवर्षापेक्षा यंदा निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात ९२.७१ टक्के मुले, तर ९७.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

- पंधरा तालुक्यातील १४ हजार ९३६ मुले, तर १४ हजार ५३२ मुली असे एकूण २९ हजार ४६८ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी १४ हजार ८६० मुले, तर १४ हजार ४८६ मुली असे एकूण २९ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. १३ हजार ७७८ मुले, तर १४ हजार ५३ मुली असे एकूण २७ हजार ८३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात विज्ञान शाखेचा ९८.७४ टक्के, कला शाखेचा ८५.७२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा ९५.२२ टक्के निकाल लागला आहे.

 पालघरमध्ये वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक पालघर : पालघर जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.५१ टक्के लागला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलींनी यंदाही बाजी (९५.१५ टक्के) मारीत मुलांना (९२.१३ टक्के) मागे टाकले आहे. सर्वाधिक निकाल वसई तालुक्याचा (९५.४४ टक्के) तर सर्वात कमी निकाल डहाणू तालुक्याचा (८७.५१ टक्के) लागला आहे. जिल्ह्यात एकूण २७,२५९ मुलांपैकी २५,११६ मुले उत्तीर्ण झाली असून, २२,९५५ मुलींपैकी २१,८४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातून ५०,३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी