शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

महामुंबईच्या मुली हुशार, गेल्या वर्षीच्या निकालामध्ये यंदा वाढ; नवी मुंबईचा निकाल ९३.७० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:15 IST

पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईमधील १५,७३७ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यामधील ८६ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. १५,६४९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी १४,६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहराचा एकूण निकाल ९३.७० टक्के लागला आहे. पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात मुलींनी मारली बाजीठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९४.०७ टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा निकाल ९०.२३ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात एकूण ८९ हजार ९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये ४४ हजार २८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ४५ हजार ६५५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण ९८ हजार २ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५० हजार ७७५ मुले आणि ४७ हजार २२७ मुलींचा समावेश होता. यापैकी ९७ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ५० हजार ५९३ मुले आणि ४७,०६९ मुलींनी परीक्षा दिली होती.

रायगडमध्येही मुलींचाच बोलबाला- अलिबाग : उच्च माध्यमिक बारावी परीक्षेत रायगड विभागाचा निकाल ९४.८३ टक्के लागला आहे. गतवर्षापेक्षा यंदा निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात ९२.७१ टक्के मुले, तर ९७.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

- पंधरा तालुक्यातील १४ हजार ९३६ मुले, तर १४ हजार ५३२ मुली असे एकूण २९ हजार ४६८ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी १४ हजार ८६० मुले, तर १४ हजार ४८६ मुली असे एकूण २९ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. १३ हजार ७७८ मुले, तर १४ हजार ५३ मुली असे एकूण २७ हजार ८३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात विज्ञान शाखेचा ९८.७४ टक्के, कला शाखेचा ८५.७२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा ९५.२२ टक्के निकाल लागला आहे.

 पालघरमध्ये वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक पालघर : पालघर जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.५१ टक्के लागला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलींनी यंदाही बाजी (९५.१५ टक्के) मारीत मुलांना (९२.१३ टक्के) मागे टाकले आहे. सर्वाधिक निकाल वसई तालुक्याचा (९५.४४ टक्के) तर सर्वात कमी निकाल डहाणू तालुक्याचा (८७.५१ टक्के) लागला आहे. जिल्ह्यात एकूण २७,२५९ मुलांपैकी २५,११६ मुले उत्तीर्ण झाली असून, २२,९५५ मुलींपैकी २१,८४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातून ५०,३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी