छोट्यांच्या पिकनिक सुरू
By Admin | Updated: May 12, 2014 06:19 IST2014-05-12T06:19:24+5:302014-05-12T06:19:24+5:30
उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने बाळगोपाळ शहरातील प्रख्यात ठिकाणी आपल्या पालकांसोबत छोट्या पिकनीकचे आयोजन करून नाष्टा, पाणपोईच्या व्यस्थेसह फिरावयास गेल्याचे चित्र दिसत आहेत.

छोट्यांच्या पिकनिक सुरू
जव्हार : उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने बाळगोपाळ जव्हारमधील सुर्यतलाव, बगीचा, हनुमान पॉर्इंट, सनसेट पॉर्इंट, खडखड धरण अशा शहरातील प्रख्यात ठिकाणी आपल्या पालकांसोबत छोट्या पिकनीकचे आयोजन करून नाष्टा, पाणपोईच्या व्यस्थेसह फिरावयास गेल्याचे चित्र दिसत आहेत. मुंबई शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावरचे परंतू उपेक्षित असलेले ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे जव्हार. त्याशिवाय अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाची बाब म्हणजे या जव्हारला संस्थानाची पार्श्वभूमी लाभली आहे. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर असे जव्हरचे वर्णन केले जाते. माथेरान महाबळेश्वर हे अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात विकसीत झाले. परंतू या ठिकाणच्या तुलनेत येथे सुविधा कमी असतील पण निर्सगाच्या मुक्तपणे उधळणीच्या बाबतीत हे गांव मागे नाही. समुद्र सपाटीपासुन सुमारे २००० फूट उंची लाभली आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य येथील वेगवेगळ्या पॉइंट्सवरून दिसते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जव्हार नगरपालिका यांच्या सौजन्याने हनुमान पॉर्इंट व सनसेट पॉर्इंट येथे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले असल्याने संध्याकाळच्या वेळेत या प्रख्यात ठिकाणी पालक आपल्या बाळगोपाळांसोबत गर्दी करीत आहेत, तसेच शनिवारी व रविवारी मुंबई, नाशीक, ठाणे येथून येणार्या पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. राजेसाहेब श्रीमंत यशवंतरावजी मुकणे यांचा नवा राजवाडा व जुना राजवाडा असल्याने येथेही पर्यटकांची गर्दी होत आहे. सुरतेवर चाल करून जात असताना जव्हारच्या शिरपामाळावर शिरपेच देऊन शिवाजी महाराजांचे स्वागत जव्हारच्या तात्कालिन राजाने केले. तो शिरपामाळ जव्हार-नाशिक रस्त्यालगत आजही जव्हारच्या वैभवात भर टाकत आहे, तेथेच हे बालचमू छोटी पिकनिक करताना दिसत आहेत.