शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

सत्र न्यायालयाची एक तपाची प्रदीर्घ लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:56 IST

नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार : अ‍ॅड. प्रमोद ठाकूर यांनी दाखल केली होती जनहित याचिका

पनवेल : पनवेल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन २७ जुलै रोजी होणार आहे. पनवेल, उरण, खालापूर तसेच कर्जत तालुक्यासाठी हजारो पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी अलिबाग येथे खेटे मारण्याचा त्रास यामुळे कायमस्वरूपी कमी होणार आहे. संबंधित न्यायालय पनवेल येथे सुरू करण्याच्या संदर्भात अ‍ॅडव्होकेट प्रमोद ठाकूर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

खालापूर, कर्जत, पनवेल, उरण या चार तालुक्यांसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन व्हावे, या उद्देशाने ३१ जानेवारी १९८९ रोजी खालापूरमध्ये वकील संघटनेची संयुक्त परिषद पार पडली होती. त्यामध्ये एक कृती समिती स्थापन करण्यात आली. पनवेल वकील संघटनेकडे समितीचे अध्यक्षपद होते. ३ मार्च १९९२ रोजी पनवेल येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय सुरू झाले. त्या वेळी पनवेलमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे कोर्ट सुरू करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने तात्त्विक मान्यता दिली होती. परंतु पनवेल येथे न्यायालयाकरिता आवश्यक अशा पायाभूत सुविधा, इमारत, न्यायाधीशांची निवासस्थाने उपलब्ध नसल्याने हे न्यायालय त्या वेळी स्थापन होऊ शकले नाही.

२००५ मध्ये अ‍ॅडव्होकेट प्रमोद ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये सत्र न्यायालय सुरू होण्यासाठी रिट याचिका दाखल करण्यात आली. २००८ मध्ये या याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेमध्ये झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाची लढाई सुरू झाली. ठाकूर यांनी या वेळी वकील म्हणून काम पाहिले. सुमारे १२ वर्षांत याचिकेत ९४ सुनावण्या पार पडल्या. उच्च न्यायालयाच्या जवळजवळ २५ न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. यामध्ये जस्टीस अभय ओक, ए. एम. खानविलकर, एस. ए. बोबडे आदींसह अनेक विख्यात न्यायाधीशांचा समावेश होता, अशी माहिती या वेळी ठाकूर यांनी दिली.

पनवेल हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्टॅम्प ड्युटी भरणारे राज्यातील एकमेव न्यायालय आहे. महिनाभरात सुमारे १ कोटीची स्टॅम्प ड्युटी पनवेलमधून सरकारकडे जमा होते. पनवेलमध्ये सत्र न्यायालय सुरू करण्यासंदर्भात सामाजिक बांधिलकीतून न्यायालयीन लढाई दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यासाठी अ‍ॅडव्होकेट राहुल ठाकूर यांनीही यशस्वी लढाई दिली. सध्याच्या घडीला सत्र न्यायालय सुरू करण्यासंदर्भात सुरू असलेला श्रेयवाद चुकीचा आहे.

पनवेलमध्ये सुरू होत असलेल्या सत्र न्यायालयामुळे खून, दरोडे, बलात्कार, खंडणी, अ‍ॅट्रॉसिटी, जन्मठेपसारखे महत्त्वाचे खटले पनवेलमध्ये चालणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा यांची बचत होईल. विशेष म्हणजे पक्षकारासह, वकील, पोलीस प्रशासनाच्या वेळेचीही बचत होणार आहे.