शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सत्र न्यायालयाची एक तपाची प्रदीर्घ लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:56 IST

नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार : अ‍ॅड. प्रमोद ठाकूर यांनी दाखल केली होती जनहित याचिका

पनवेल : पनवेल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन २७ जुलै रोजी होणार आहे. पनवेल, उरण, खालापूर तसेच कर्जत तालुक्यासाठी हजारो पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी अलिबाग येथे खेटे मारण्याचा त्रास यामुळे कायमस्वरूपी कमी होणार आहे. संबंधित न्यायालय पनवेल येथे सुरू करण्याच्या संदर्भात अ‍ॅडव्होकेट प्रमोद ठाकूर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

खालापूर, कर्जत, पनवेल, उरण या चार तालुक्यांसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन व्हावे, या उद्देशाने ३१ जानेवारी १९८९ रोजी खालापूरमध्ये वकील संघटनेची संयुक्त परिषद पार पडली होती. त्यामध्ये एक कृती समिती स्थापन करण्यात आली. पनवेल वकील संघटनेकडे समितीचे अध्यक्षपद होते. ३ मार्च १९९२ रोजी पनवेल येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय सुरू झाले. त्या वेळी पनवेलमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे कोर्ट सुरू करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने तात्त्विक मान्यता दिली होती. परंतु पनवेल येथे न्यायालयाकरिता आवश्यक अशा पायाभूत सुविधा, इमारत, न्यायाधीशांची निवासस्थाने उपलब्ध नसल्याने हे न्यायालय त्या वेळी स्थापन होऊ शकले नाही.

२००५ मध्ये अ‍ॅडव्होकेट प्रमोद ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये सत्र न्यायालय सुरू होण्यासाठी रिट याचिका दाखल करण्यात आली. २००८ मध्ये या याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेमध्ये झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाची लढाई सुरू झाली. ठाकूर यांनी या वेळी वकील म्हणून काम पाहिले. सुमारे १२ वर्षांत याचिकेत ९४ सुनावण्या पार पडल्या. उच्च न्यायालयाच्या जवळजवळ २५ न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. यामध्ये जस्टीस अभय ओक, ए. एम. खानविलकर, एस. ए. बोबडे आदींसह अनेक विख्यात न्यायाधीशांचा समावेश होता, अशी माहिती या वेळी ठाकूर यांनी दिली.

पनवेल हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्टॅम्प ड्युटी भरणारे राज्यातील एकमेव न्यायालय आहे. महिनाभरात सुमारे १ कोटीची स्टॅम्प ड्युटी पनवेलमधून सरकारकडे जमा होते. पनवेलमध्ये सत्र न्यायालय सुरू करण्यासंदर्भात सामाजिक बांधिलकीतून न्यायालयीन लढाई दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यासाठी अ‍ॅडव्होकेट राहुल ठाकूर यांनीही यशस्वी लढाई दिली. सध्याच्या घडीला सत्र न्यायालय सुरू करण्यासंदर्भात सुरू असलेला श्रेयवाद चुकीचा आहे.

पनवेलमध्ये सुरू होत असलेल्या सत्र न्यायालयामुळे खून, दरोडे, बलात्कार, खंडणी, अ‍ॅट्रॉसिटी, जन्मठेपसारखे महत्त्वाचे खटले पनवेलमध्ये चालणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा यांची बचत होईल. विशेष म्हणजे पक्षकारासह, वकील, पोलीस प्रशासनाच्या वेळेचीही बचत होणार आहे.