शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:47 IST

आघाडीतील नेत्यांनी आपल्यातील वाद दूर करून किमान निर्णय प्रकियेत तरी आम्ही एक आहोत, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. विशेषत: आघाडीतील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

नवी मुंबई - कोरोनासारख्या परिस्थितीत सरकार एक निर्णय घेत आहे, तर सरकारमध्ये असलेल्या राजकीय पक्षांचे मंत्री वेगळा निर्णय घेत आहेत. आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वारंवार निर्णय बदलले जात असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोविड रुग्णालये आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आले होते. त्या वेळी नवी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आघाडीतील नेत्यांनी आपल्यातील वाद दूर करून किमान निर्णय प्रकियेत तरी  आम्ही एक आहोत, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. विशेषत: आघाडीतील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. कोरोनाच्या लढाईत आम्ही सरकारच्या सोबत असल्याचे फडणवीस म्हणाले.नवी मुंबईतील बाजारपेठेमधून शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले असून, या ठिकाणी स्क्रीनिंग आणि जलद टेस्टिंग करण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू झाली पाहिजे. रुग्णालयांनी बिलासाठी तगादा लावू नये, यासाठी महापालिकेने व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे, अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवीन वाहने घेणे प्राथमिकता नाहीकोरोनाचे संकट असताना मंत्र्यांनी नवीन वाहने घेण्यासाठी प्राथमिकता देण्याची गरज नसल्याचे फडणवीस यांनी सांगत, वाहनामध्ये काही समस्या असल्यास स्वत:ची वाहने वापरली जाऊ शकतात. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कपात करण्यात आले आहेत. दिवसरात्र कर्तव्य निभावणाºया पोलिसांना आवश्यक बाबी देण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाते. अनावश्यक कामे केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोरोनाची परिस्थिती स्थिर झाल्यावर नवीन वाहने खरेदी करता येतील, असे ते म्हणाले.कार्यकारिणीत कोणालाही डावलले नाहीभारतीय जनता पक्षाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर झाली. त्याविषयी फडणवीस म्हणाले, भाजपची कार्यकारिणी जम्बो आहे. राज्यात १२ उपाध्यक्ष, १२ मंत्री, ५ महामंत्री असतात. कार्यकारिणीमध्ये काही सदस्य, काही निमंत्रित आणि काही विशेष निमंत्रित असतात. त्याप्रमाणे, सर्वसमावेशक कार्यकारिणी झालेली आहे. त्यामुळे यामध्ये कोणाची काही फारशी नाराजी नसेल, असे वाटत असल्याचे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे