शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पनवेल आगारात बसच्या रांगा, डिझेल पुरवठ्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 02:18 IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात.

वैभव गायकर पनवेल : गणेशोत्सवातकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात. मात्र, रविवारी रात्रीपासून पनवेल बस आगारात कोकणात जाणाºया बसेसना डिझेलचा पुरवठा झाला नसल्याने अनेक गाड्या पनवेल बस आगारात उभ्या आहेत.स्थानिक परिसरात धावणाºया गाड्या सुरळीत सुरू असल्या तरी कोकणात जाणाºया गाड्यांची मोठी रांग पनवेल बस आगारात लागून राहिली आहे. रविवारी रात्रीपासून या बसना डिझेलचा पुरवठा होत नसल्याने ३० ते ४० गाड्या उभ्या होत्या. यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे सोमवारी काँग्रेसने देशभरात भारत बंदचा आवाज दिला होता. त्यातच आगारात बसेसची मोठ्यात मोठी रांग लागली असल्याने या बसेस भारत बंदमुळे बंद ठेवण्यात आल्याची चर्चा या परिसरात रंगली होती. मात्र, इंधन पुरवठा न झाल्याने या बसेस जागेवर उभ्या असल्याचे सूत्रांच्या मार्फत सांगण्यात आले. विशेष म्हणजे वाहन सुरू असताना मध्यंतरी इंधन संपल्यास संबंधित वाहन चालकावर निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न एसटी कर्मचाºयांकडून उपस्थित होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पनवेल आगारात डिझेलचे टँकर दाखल झाल्याने बस सुटण्यास काही प्रमाणात सुरु वात झाली.पनवेलचे आगार प्रमुख विलास गावंड यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, डिझेलच्या पुरवठ्याअभावी ही परिस्थिती उद्भवली नसून कुर्ला आगारात पार्किंगची समस्या निर्माण झाल्यामुळे त्या गाड्या पनवेल डेपोमध्ये ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र डिझेलच्या पुरवठ्याअभावी ही समस्या उद्भवल्याचे समजते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवkonkanकोकणpanvelपनवेल