शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:08 IST

बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यातील संपूर्ण मासळी मार्केट परिसरात केरकचरा, टाकाऊ ओल्या मासळीचे अवशेष जागीच टाकण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.

- अनंत पाटीलनवी मुुंबई : सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे टाळून नवी मुंबईतील काही गावठाणात मासळी बाजारात मात्र खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यातील संपूर्ण मासळी मार्केट परिसरात केरकचरा, टाकाऊ ओल्या मासळीचे अवशेष जागीच टाकण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे या गावाच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.रविवारी सकाळी दिवाळे कोळीवाड्यातील मार्केटमध्ये मासळी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. यावेळी सामाजिक अंतराचा विसरच पडला होता, तसेच सगळीकडे अस्वच्छता होती. मासळी विक्रेत्यांकडून महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या बाबतीत सहकार्य मिळत नसल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येते.दिवाळे येथील खाडीच्या किनारी मच्छी विक्रेत्यांसाठी असलेल्या जागेवर ड्रेनेज, पाणी आणि अन्य सुविधा नसल्याने मच्छी विक्रेत्या महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. हे मासळी मार्केट उभारत असलेल्या ठिकाणची जागा मेरिटाइम बोर्डाच्या अखत्यारित असल्याने, त्यांची परवानगी लालफितीत अडकून पडल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत नाही. मच्छीचे दूषित सांडपाणी आणि सडलेल्या माशांचा कचरा जागीच पडलेला असल्याने, परिसरात प्रचंड दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, हवेतील संसर्गजन्य आजारामुळे परिसरात भीती पसरली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, दिवाळे गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कोळीवाड्यातील मार्केट परिसराची अवस्था फार गंभीर आहे. येथील काही रहिवाशांच्या आडमुठ्या धोरणामुळे स्वच्छता राखली जात नाही. केवळ महापालिकेला दोषी न स्वच्छता ठेवणे प्रत्येकाची जबाबदारीही आहे. या गावाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, पर्यावरणाच्या परवानगी संदर्भात मंजुरी न मिळाल्यामुळे हे काम थांबले आहे. लवकरच पर्यावरण खात्याची मंजुरी मिळणार असल्यामुळे गावच्या विकासपयोगी कामांना गती येईल.-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूरआम्ही मच्छी मार्केट परिसरात राहत असल्याने या दुर्गंधीचा खूप जास्त त्रास होतो. अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कुटुंबाला रोगराईचा सामना करावा लागत आहे.-विघ्नेश कोळी, ग्रामस्थमच्छी मार्केटमध्ये स्वच्छतेची पुरेशी उपाययोजना व कचºयाची विल्लेवाट लावण्यासाठी कोणतीच साधने उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. -अंकुश कोळी, ग्रामस्थघाण पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने इथे माश्या, डास मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे घरातील लहान मुलांना साथीच्या रोगांनी वेढले आहे. तरीही पालिका अथवा स्थानिक पुढारी याची दखल घेत नाहीत.-प्रतिभा कोळी, ग्रामस्थ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई