शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

खारघरमध्ये मतदारयाद्यांत घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:37 AM

नगरसेविकेचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

पनवेल : लोकसभेच्या निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. विविध टप्प्यात देशभरात या निवडणुका होत आहेत. मात्र, मतदारयादींतील घोळामुळे नावे शोधताना नागरिकांची दमछाक होताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.खारघर शहरातील मतदारयादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे, त्यामुळे निवडणुकीच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात स्थानिक नगरसेविका व महिला बाल कल्याण सभापती लीना गरड यांनी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांना निवेदन सादर करून मतदारयादींमधील निर्माण झालेला गोंधळ लवकरात लवकर दूर करण्याची मागणी केली आहे.खारघर नोडमध्ये एकूण एक लाख ३० हजारांच्या आसपास मतदार आहेत. शहरात एकूण आठ मतदार केंद्र आहेत, तसेच ८६ बूथचा समावेश आहे. यापूर्वीची मतदार केंद्रे रद्द झाल्याने शहरातील मतदारयादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे दिसून येत आहे. एका कुटुंबातील चार मतदारांची नावे वेगवेगळ मतदार केंद्रावर येत असून, त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोंधळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. खारघर शहरात ही समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने गरड यांनी या संदर्भात शहरात मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी १०० मदत केंद्र उभारण्याची मागणी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दातात्रेय नवले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्र म, उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात मतदारयादींचे घोळ अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे, अशा परिस्थितीत घराजवळ असलेल्या मतदार केंद्रामध्ये आपले नाव न येता शहराच्या दुसºया टोकाच्या केंद्रात नाव येत असल्याने मतदारांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी गरड यांना दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Navi Mumbaiनवी मुंबई