शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कर्जतमधील खारबेवाडीत पाणीटंचाई

By admin | Updated: May 24, 2017 01:25 IST

कर्जत तालुक्यातील खारबेवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सात ते आठ मैल पायपीट करून पिण्यायोग्य पाणी आणावे लागते आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील खारबेवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सात ते आठ मैल पायपीट करून पिण्यायोग्य पाणी आणावे लागते आहे. या तहानलेल्या ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी युवा प्रबोधिनी मंडळ मांडवणे या सेवाभावी संघटनेने मदतीचा हात पुढे केला असून, टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.कर्जत तालुक्यातील अनेक गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईची झळ जाणवते. आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थांप्रमाणेच शेतकऱ्यांनासुद्धा पाणीटंचाईची समस्या भेडसावत असून, जनावरांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. खारबेवाडी या परिसरातील ग्रामस्थांची पिण्यायोग्य पाणी आणण्यासाठी महिला व गावातील लहान मुले जवळजवळ सात ते आठ मैल चालून हंडाभर पाणी आणत आहेत. पाण्यासाठी मोठी कसरत या वाडीतील महिलांना करावी लागत आहे. युवा प्रबोधिनी मंडळ मांडवणे यांना ही बाब केलेल्या सर्वेक्षणात दिसून आली. त्यानंतर त्यांनी तातडीने बैठक बोलावून ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरविण्याचे निश्चित केले.दुर्गम भागातील वाडी-वस्त्यांवर पोहोचणे शासनस्तरावर सहज शक्य नसल्याने शासन कायमच सेवाभावी संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत असते. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत युवा प्रबोधिनी मंडळ मांडवणे यांनी मदतीचा हात दिला. युवा प्रबोधिनी या संस्थेने लगेचच काही आगाऊ रक्कम जमा करून या गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेतले. रविवारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पाण्याचे टँकर आणून गावाला पाणीपुरवठा केला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष किरण कर्णूक, उपाध्यक्ष नीतेश मसणे, सल्लागार केतन भोसले, खजिनदार अंकुश रेवाळे, सहखजिनदार सागर कर्णूक, सचिव रोहिदास नाईक, सहसचिव रोशन सावंत, तसेच मांडवणे ग्रामपंचायत सरपंच अंजली गांदिवले व सदस्या हिंदोळ या वेळी उपस्थित होत्या.पाणीप्रश्नाविषयी के लीचर्चा १युवा प्रबोधिनी मंडळाच्या सदस्यांनी पाण्याचे महत्त्व व पाणीटंचाईची समस्या कशी सोडवता येईल, याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व गावाची पाण्याची समस्या लवकरात लवकर कशी सोडवता येईल, त्याविषयी सरपंच अंजली गांदिवले व सदस्या हिंदोळा यांच्यासमवेत चर्चा केली.२रविवारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पाण्याचे टँकर आणून गावाला पाणीपुरवठा केला. यामुळे काही प्रमाणात का होईना, येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, या पाणीपुरवठ्या बाबत समाधान व्यक्त के ले आहे.