शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पंडितांना हव्या स्वतंत्र वसाहती, काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:49 IST

काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- वैभव गायकरपनवेल - काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १९९० दरम्यान काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर या समुदायाने कठीण परिस्थितीला तोंड दिले आहे.केंद्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार, या सर्वांना मातृभूमीत परतण्याची संधी मिळणार आहे. काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर हा समुदाय दिल्ली, जम्मू, बंगळुरू, फरिदाबाद (हरियाणा), चंदिगड, जयपूर, पुणे, मुंबई आदीसह देशभरातील कानाकोपऱ्यात स्थायिक झाला आहे.१९९० च्या दरम्यान काश्मीरमधून स्थानिक मुस्लीम रहिवाशांच्या अत्याचाराचे बळी ठरलेली जवळ जवळ तीन लाख कुटुंब काश्मीरमधून स्थलांतरित झाली. यापैकी जम्मूमधील ५२ हजार, तर दिल्लीमधील नऊ हजार कुटुंबीयांची काश्मीरमधून विस्थापित झाल्याची नोंदणी आहे. मात्र, ही संख्या मोठी असल्याचे काश्मिरी पंडित असोसिएशन मुंबईचे चमनलाल रैना यांनी सांगितले. काश्मीरमधील अत्याचाराला बळी ठरलेले लाखो कुटुंब देशभरात विविध राज्यांत आज वास्तव्यास आहेत. या सर्वांशी समन्वय साधूनच केंद्र शासनाने काश्मिरी पंडित रहिवाशांबद्दल पॉलिसी ठरविणे गरजेचे आहे. केंद्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याला खूप विलंब झाल्याचे ८३ वर्षीय चमनलाल रैना सांगतात.मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या काश्मिरी पंडित रहिवाशांनी काश्मिरी पंडित असोसिएशनची १९७० मध्ये स्थापना केली. सध्याच्या घडीला असोसिएशनमध्ये १२०० कुटुंबांनी नोंदणी केली आहे. पंडिताना काश्मीरमधून हटविण्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिकांचा वेगळा अजेंडा होता. काश्मीर राज्याला मुस्लीम राज्य बनविण्यासाठी तत्कालीन मुस्लीम नेत्यांनी स्थानिक मुस्लिमांचे कान भरून काश्मिरी पंडितांना घरे सोडण्यास भाग पाडले असल्याचे रैना सांगतात. हिंसाचाराला आपले कुटुंबीय बळी पडता कामा नये, म्हणूनच लाखो काश्मिरी कुटुंबीयांनी आपली घरे सोडल्याचे काश्मिरी पंडित असोसिएशनचे ट्रस्टी दिलीप भट यांनी सांगितले.मायभूमीत परतण्याची संधी सरकारने दिली, याकरिता काश्मीरमध्येच स्वतंत्र काश्मीर पंडित वसाहत उभारण्याची गरज आहे. त्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने हाती घेण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये काश्मीर पंडितांसह डोग्राम, हिंदू, महाजन, शीख आदी अल्पसंख्याक समाजदेखील वास्तव्यास होते, असे चांद भट यांनी सांगितले.काश्मिरी पंडित काश्मीरचे खरे मालककाश्मीरमध्ये सुशिक्षित व समृद्ध म्हणून काश्मिरी पंडित ओळखले जात होते. शेकडो हेक्टर बागा, शेतजमीन या काश्मिरी पंडितांच्या नावावर होत्या. मात्र, स्थानिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काश्मिरी पंडितांवर अन्याय करून त्यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले, असे चमनलाल रैना यांनी सांगितले.काश्मिरी पंडित असोसिएशनशी समन्वय साधावादेशभरातील विविध काश्मिरी पंडित समाजाच्या असोसिएशन आजही कार्यरत आहेत. केंद्र शासनाने या असोसिएशनशी समन्वय साधून मसुदा निश्चित करण्याची गरज आहे. तशी मागणी आम्ही केंद्र शासनाला पत्र लिहून करणार असल्याचे चमनलाल रैना यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत