शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

काश्मीरमध्ये पंडितांना हव्या स्वतंत्र वसाहती, काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:49 IST

काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- वैभव गायकरपनवेल - काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १९९० दरम्यान काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर या समुदायाने कठीण परिस्थितीला तोंड दिले आहे.केंद्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार, या सर्वांना मातृभूमीत परतण्याची संधी मिळणार आहे. काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर हा समुदाय दिल्ली, जम्मू, बंगळुरू, फरिदाबाद (हरियाणा), चंदिगड, जयपूर, पुणे, मुंबई आदीसह देशभरातील कानाकोपऱ्यात स्थायिक झाला आहे.१९९० च्या दरम्यान काश्मीरमधून स्थानिक मुस्लीम रहिवाशांच्या अत्याचाराचे बळी ठरलेली जवळ जवळ तीन लाख कुटुंब काश्मीरमधून स्थलांतरित झाली. यापैकी जम्मूमधील ५२ हजार, तर दिल्लीमधील नऊ हजार कुटुंबीयांची काश्मीरमधून विस्थापित झाल्याची नोंदणी आहे. मात्र, ही संख्या मोठी असल्याचे काश्मिरी पंडित असोसिएशन मुंबईचे चमनलाल रैना यांनी सांगितले. काश्मीरमधील अत्याचाराला बळी ठरलेले लाखो कुटुंब देशभरात विविध राज्यांत आज वास्तव्यास आहेत. या सर्वांशी समन्वय साधूनच केंद्र शासनाने काश्मिरी पंडित रहिवाशांबद्दल पॉलिसी ठरविणे गरजेचे आहे. केंद्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याला खूप विलंब झाल्याचे ८३ वर्षीय चमनलाल रैना सांगतात.मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या काश्मिरी पंडित रहिवाशांनी काश्मिरी पंडित असोसिएशनची १९७० मध्ये स्थापना केली. सध्याच्या घडीला असोसिएशनमध्ये १२०० कुटुंबांनी नोंदणी केली आहे. पंडिताना काश्मीरमधून हटविण्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिकांचा वेगळा अजेंडा होता. काश्मीर राज्याला मुस्लीम राज्य बनविण्यासाठी तत्कालीन मुस्लीम नेत्यांनी स्थानिक मुस्लिमांचे कान भरून काश्मिरी पंडितांना घरे सोडण्यास भाग पाडले असल्याचे रैना सांगतात. हिंसाचाराला आपले कुटुंबीय बळी पडता कामा नये, म्हणूनच लाखो काश्मिरी कुटुंबीयांनी आपली घरे सोडल्याचे काश्मिरी पंडित असोसिएशनचे ट्रस्टी दिलीप भट यांनी सांगितले.मायभूमीत परतण्याची संधी सरकारने दिली, याकरिता काश्मीरमध्येच स्वतंत्र काश्मीर पंडित वसाहत उभारण्याची गरज आहे. त्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने हाती घेण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये काश्मीर पंडितांसह डोग्राम, हिंदू, महाजन, शीख आदी अल्पसंख्याक समाजदेखील वास्तव्यास होते, असे चांद भट यांनी सांगितले.काश्मिरी पंडित काश्मीरचे खरे मालककाश्मीरमध्ये सुशिक्षित व समृद्ध म्हणून काश्मिरी पंडित ओळखले जात होते. शेकडो हेक्टर बागा, शेतजमीन या काश्मिरी पंडितांच्या नावावर होत्या. मात्र, स्थानिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काश्मिरी पंडितांवर अन्याय करून त्यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले, असे चमनलाल रैना यांनी सांगितले.काश्मिरी पंडित असोसिएशनशी समन्वय साधावादेशभरातील विविध काश्मिरी पंडित समाजाच्या असोसिएशन आजही कार्यरत आहेत. केंद्र शासनाने या असोसिएशनशी समन्वय साधून मसुदा निश्चित करण्याची गरज आहे. तशी मागणी आम्ही केंद्र शासनाला पत्र लिहून करणार असल्याचे चमनलाल रैना यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत