शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

जेएनपीटी ते पुणे होणार सुसाट! खासगीकरणातून ३० किमीचा नवा हरित महामार्ग, ३०१० कोटींचा खर्च 

By नारायण जाधव | Updated: February 5, 2024 19:02 IST

नव्या हरित महामार्गाचा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे शहराच्या अधिक जवळ येणार आहे.

नवी मुंबई: आर्थिक राजधानी मुंबई आणि सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा-शेवा या सागरी सेतूचे लोकार्पणानंतर सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात झटपट जाण्यासाठी एमएमआरडीएकडून चिर्ले जंक्शन येथे आंतरमार्गिकांचे काम सुरू असतानाच आता नॅशनला हायवे ॲथोरिटीनेही ही दोन्ही शहरे जवळ आणण्यासाठी कंबर कसली आहे. यानुसार जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई-पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत २९.१५ किमी लांबीचा नवा सहापदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामावर नॅशनला हायवे ॲथोरिटी सुमारे ३०१० कोटी ३६ लाख रुपये खर्च करणार आहे. या मार्गाचा पुण्यासह कर्जत-खोपोली परिसरालाही लाभ होणार आहे.

या नव्या हरित महामार्गाचा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे शहराच्या अधिक जवळ येणार आहे. सध्या या नव्या हरित महामार्गाची निविदा प्रक्रिया नॅशनला हायवे ॲथोरिटीने सुरू केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतूच्या लोकार्पणानंतर भविष्यात कोकण हायवेमुळे गोवा राज्याचे अंतरही दोन तासांनी कमी होणार आहे. सध्या रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाचे काम विविध टप्प्यात सुरू केले असून यातील महत्त्वाचा टप्पा रेवस ते करंजा या धरमतर खाडीवरील पुलाचा आहे. तो झाल्यानंतर रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग ते मुंबई हे अंतर अवघ्या ४० मिनिटात गाठता येणार आहे.

चिर्ले येथेही सुरू आहे आंतरमार्गिकांचे कामतर अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच त्याला मुंबई-गोवा हायवे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसह जुन्या मुंबई पुणे हायवेला जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून चिर्ले येथे आंतरमार्गिकांच्या काम जोमाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जेएनपीए बंदरातून होणाऱ्या अवजड मल्टिएक्सल कंटेनर ट्रकच्या वाहतुकीमुळे हाेणारी वाहतूककोंडी आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरील ताण कमी करण्यासाठी चिर्ले टोकापासून ते गव्हाणफाटा आणि पळस्पेफाटा ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत ७.३५ किलोमीटर लांबीचा असा एलिव्हेटेड कॉरिडॉर असून त्यावर १३५१.७३ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

नव्या महामागार्वर असणार टोलमहाराष्ट्र शासनाकडूनही ही कामे सुरू असतानाच आता केंद्र शासनाच्या मालकीच्या नॅशनला हायवे ॲथोरिटीनेही मुंबई-पुणे दोन्ही शहरे जवळ आणण्यासाठी खासगीकरणातून जेएनपीटी नजिकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई-पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत २९.१५ किमी लांबीचा नवा सहा पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यावर ३०१० कोटी ३६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग बांधून झाल्यानंतर संबधित कंत्राटदार त्याचा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईPuneपुणे