शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

जेएनपीटीने केले २७ हजार कोटींचे सामंजस्य करार; भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:46 PM

भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण

उरण : २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या ‘मेरिटाइम इंडिया समिट २०२१’च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी (२४ फेब्रुवारी) बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूकदारांशी २७००० कोटी रुपयांच्या ३० सामंजस्य करारांवर  जेएनपीटीचे अध्यक्ष  संजय सेठी यांनी  स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते. 

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे देशातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये डीपी वर्ल्ड, जे. एम. बक्शी ॲण्ड कंपनी, गणेश बेंझो, बीपीसीएल, एनआईटीआईई, एस.एस.जी. फार्मा प्रा.लि., सूरज ॲग्रो, जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक प्रा.लि., सिनलाइन इंडिया लिमिटेड या कंपन्यांचा समावेश असून, त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस, वेअरहाउसिंग, कोल्ड स्टोरेज, एफटीडब्ल्यूझेड, फार्मा, कन्फेक्शनरी मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी सेवा, फूड प्रोसेसिंग संबंधी सामंजस्य करार केले आहेत. 

भारतीय बंदरे आणि सागरी क्षेत्रातील देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीस चालना देण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री  मनसुख मंडावीया यांच्या पुढाकारातून मार्च २०२१ मध्ये ‘मेरिटाइम इंडिया समिट २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिखर संमेलन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एमआयएस २०२१’चे उद्घाटन करण्यात येणार असून केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री  मनसुख मंडावीया यांचे भाषण होईल.

संमेलनात २४ देश सहभागी होतील आणि ४०० हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन सादर होईल.  जेएनपीटीचे अध्यक्ष  संजय सेठी हे पहिल्या सत्राचे - ‘जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास’ - संयोजक असतील. उपाध्यक्ष उन्मेष  वाघ, भा.रा.से. हे ‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील विशेष सत्राचे संयोजक असतील. 

जेएनपीटी संपूर्ण जगभरात बंदर उद्योगासाठी दर्जेदार सेवेचा बेंचमार्क स्थापित करण्यासाठी समर्पित असून निरंतर व्यापार वाढीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने बंदरातील कार्यक्षमता व वाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या गुंतवणूक केली आहे. ‘मेरिटाइम इंडिया समिट’मध्ये जेएनपीटीने विविध कंपन्यांसमवेत ३० सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे जेएनपीटीला देशातील गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. जगभरात कोविड १९ चा परिणाम झाल्यानंतरही जेएनपीटीमध्ये २७ हजार कोटींची नवीन गुंतवणूक झाली आहे. यामुळे रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील.- संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई