शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली; सफरचंदाला मागणी जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 5:15 AM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची आवक वाढली आहे.

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची आवक वाढली आहे. मंगळवारी सफरचंदाची सर्वाधिक ३७४ टन आवक झाली असून, डाळिंबासह मोसंबीची आवकही वाढली आहे.मुंबई बाजार समितीमध्ये देशाच्या सर्व भागांतून फळांची आवक होऊ लागली आहे. गणेशोत्सवामध्ये फळांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनीही आवक वाढविली आहे. सद्य:स्थितीमध्ये हिमाचल व काश्मीरच्या काही भागांतून सफरचंदाची आवक होत आहे. मंगळवारी सर्वाधिक ३७४ टन आवक झाली आहे. सोलापूर व राज्याच्या इतर भागांतून डाळिंबाची मोठी आवक होत आहे. देशाच्या विविध भागांतून मोसंबी येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले.गेल्या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ४० ते ६० रुपयांना विकले जाणारे डाळिंब ३० ते ५० रुपये किलो दराने विकले जात आहे. ३६ ते ५६ रुपये किलो दराने विकले जाणारे चिकू मंगळवारी २५ ते ४५ रुपये दराने विकले जात होते. पुढील दहा दिवस आवक वाढणार असल्याने बाजारभाव स्थिर राहतील, अशी माहिती फळ व्यापारी महेश मुंढे यांनी दिली.>फळांची तुलनात्मक आवक व बाजारभाववस्तू आवक होलसेल दर(टन) (किलो)चिकू ३१ २५ ते ४५डाळिंब २१३ ३० ते ५०कलिंगड १७२ ५ ते ९मोसंबी २५१ ५ ते २५पपई २४० ३ ते १७सफरचंद ३७४ २० ते ७५टरबूज १९ ८ ते १८