शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

वाहनचोरीसह महिलांवरील अत्याचारात वाढ

By admin | Updated: January 8, 2017 02:58 IST

पोलिसांनी वर्षभर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे २०१५ च्या तुलनेमध्ये ६०० कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ६७ वरून ७० टक्के झाले आहे.

नवी मुंबई : पोलिसांनी वर्षभर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे २०१५ च्या तुलनेमध्ये ६०० कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ६७ वरून ७० टक्के झाले आहे. चोरी घरफोडीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे; पण वाहनचोरी व महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नवीन वर्षामध्ये ते गुन्हे कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे संभाव्य गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांपुढे आहे. घरखरेदीच्या बहाण्याने बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीसह ठकबाजी करून फसवणुकीच्या घटना शहरात घडत आहेत. त्याशिवाय दररोज घडणाऱ्या घरफोडी, सोनसाखळीचोरी, वाहनचोरी, अशा गुन्हेगारी घटनांच्याही तपासाची डोकेदुखी पोलिसांना आहेच. बांधकाम व्यावसायिकांकडून घरखरेदी-विक्रीच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीतून करोडो रुपयांची अफरातफर होत आहे. त्यामुळे अशा घटनांचा गांभीर्याने तपास करण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे आर्थिक विभाग तयार करण्यात आलेला आहे. या विभागाने ४१० गुन्हे दाखल करून २७० गुन्ह्यांमधील आरोपींवर कारवाई केली आहे. त्यापैकी ५६ गुन्हे बिल्डरांच्या विरोधातील आहेत. त्यापैकी काही बिल्डर्सवर कारवाई करून न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची संपत्ती जप्त केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. तर काहींची मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे विनंती केली असून, त्यामध्ये बालाजी बिल्डर्स, व्हाइट हाउस, एस. पी. असोसिएट्स या बिल्डर्सचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात पूर्ववैमनस्यातून घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या विशेष घटना नसल्या तरीही, किरकोळ कारणातून हत्येचे गुन्हे घडलेले आहेत. गतवर्षात अशा ४२ हत्या झाल्या असून त्यापैकी ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, उर्वरित हत्येच्या गुन्ह्यांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. तर जबरी दरोड्याच्या दहा घटना घडल्या असून, त्या सर्वच गुन्ह्यांची उकल झालेली आहे. यामध्ये सीवूडमधील पॉप्युलर फायनान्सवरील दरोड्याचाही समावेश आहे. या गुन्ह्यात ६ जणांना अटक झाली असून, त्यांच्या ५ साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. २०१५मध्येही घडलेल्या १७ पैकी १७ दरोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. शहरात नोकरवर्ग मोठ्या संख्येने असून ते कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्यांचे घर बंद असते. याच संधीचा फायदा घेत, शहरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे. दिवसा तसेच रात्री त्यांच्याकडून घरफोड्या केल्या जात आहेत; परंतु गतवर्षी पोलिसांनी विविध टोळ्यांविरोधात कारवाईचा फास आवळल्यामुळे २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा विश्वास पोलीस आयुक्त नगराळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. याप्रसंगी सहआयुक्त मधुकर पाण्डे, उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ २चे उपआयुक्त राजेंद्र माने, वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार, विशेष शाखा उपआयुक्त तुषार दोशी, प्रशासन उपआयुक्त सुधाकर पाठारे आदी उपस्थित होते.आठ बारवर कारवाईनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ८ बारवर व दोन आॅर्क्रेस्ट्रावर नियमभंगाची कारवाई केलेली आहे. सद्यस्थितीला आयुक्तालयात २२ बारला आॅर्क्रेस्ट्राची परवानगी आहे. त्यापैकी पाच परवाने गतवर्षी देण्यात आलेले आहेत. सुरक्षेची थकबाकीराजकीय अथवा व्यावसायिक व्यक्तींना मागणीनुसार अंगरक्षक म्हणून पोलीस पुरवले जातात. त्यासाठी संबंधिताला पोलिसांच्या सेवेचा शुल्क भरावा लागतो. मात्र, मागील पाच वर्षांत अनेकांनी अंगरक्षकाचे शुल्क भरलेले नाही. सुमारे ९७ लाख रुपयांची ही थकबाकी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. २६ शस्त्रपरवाने रद्दआयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण १,६३७ जण परवाना असलेले शस्त्रधारक आहेत. गतवर्षात ७ नवे परवाने देण्यात आले असून, ५ शासनाच्या निर्देशानुसार देण्यात आले आहेत. तर परवाना असलेल्या शस्त्रांचा गैरवापर अथवा संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे गतवर्षात २६ शस्त्रपरवाने रद्द, तर १ निलंबित करण्यात आला आहे. वाहनचोरीचे आव्हानवाहनचोरीच्या गुन्ह्यांत शहराबाहेरच्या टोळ्या सक्रिय असून, काही स्थानिक तरुणांचाही त्यात समावेश आहे. त्यापैकी अनेकांना रंगेहाथ अथवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी पकडलेले आहे; चोरलेले वाहन पामबीच मार्गे अथवा सायन-पनवेल मार्गाने काही मिनिटांत शहराबाहेर नेले जात आहे. त्यामुळे वाहनचोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून वारंवार केल्या जात आहेत.गुन्हेगारांवर पाळतगंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांतर्फे लक्ष ठेवले जात आहे. त्यापैकी काहींना तडीपारही करण्यात आले आहे. त्याशिवाय ज्यांना जामीन मिळालेला आहे, अशा गुन्हेगारांचा जामीन न्यायालयातून रद्द करण्याचाही प्रयत्न पोलीस करणार आहेत. तर काही सराईत टोळ्यांवर मोका अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाईचेही पाऊल येत्या काळात पोलिसांकडून उचलले जाणार आहे. सुरक्षारक्षक एजन्सीवर कारवाईपोलिसांच्या परवाना विभागामार्फत गतवर्षात ५८ नव्या सुरक्षारक्षक एजन्सीला परवाना देण्यात आलेला आहे. त्याशिवाय नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गतवर्षात विंद्याचल एजन्सीचा परवानाही रद्द करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तांचा पालिकेला टोलामहापालिकेतर्फे पोलिसांना पत्र देऊन काही प्रकरणांमधील भूमाफियांवर मोका लावण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे पत्रकार परिषदेत विचारणा केली असता, त्यांनी अप्रत्यक्षरित्या कोणावर मोका लावायचा की नाही, हे इतरांनी सांगण्याची गरज नसून, आम्हाला आमचे काम चोख येते, असा टोला मारला. यावरून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत पोलीस आयुक्तांचे असलेले मतभेद दुसऱ्यांना उघड झाले.