शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

नवी मुंबईत न्यायाधीशांसह ४४ पदे निर्माण करण्यास मंजुरी; विधी व न्याय विभागाचा निर्णय

By नारायण जाधव | Updated: November 11, 2022 18:59 IST

नवी मुंबईत न्यायाधीशांसह ४४ पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  

नवी मुंबई : नवी मुंबईसारख्या वाढत्या नागरीकरण होत असलेल्या शहरांतील कनिष्ठ न्यायालयातील खटल्यांची संख्या तसेच फौजदारी आणि गुन्हेगारी खटल्यांचे प्रमाण पाहता उच्च न्यायालयाच्या न्यायालय स्थापना समितीने नवी मुंबईत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन्यास मान्यता दिल्यानंतर गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाने तशी मंजुरी दिली होती. मात्र, त्यासाठीचे न्यायाधीश आणि कर्मचारी उपलब्ध नव्हते. मात्र, आता राज्याच्या विधी व न्याय विभागाने या दोन्ही न्यायालयांसाठी न्यायाधीशांसह अधिकारी व कर्मचारी अशा ४४ पदांना मंजुरी दिली आहे. 

न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांना मंजुरी दिल्यानंतर नवी मुंबईतील वकील आणि अशिलांनी आनंद व्यक्त केला आहे. यात १९ पदे ही जिल्हा व अतिरिक्त न्यायालयासाठी, तर १६ पदे दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तरसाठीची आहेत. या पदांना ९ नोव्हेंबर रोजी मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाची पाच आणि दिवाणी न्यायालयाची ४ अशी ९ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरता येणार आहेत. नवी मुंबई राज्यातील सर्वाधिक नागरीकरण होणारे आणि औद्योगिक विकासासह आयटी पार्क असलेले शहर आहे.

 नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, टीटीसी औद्योगिक वसाहत यामुळे येथील लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने दिवाणी आणि फौजदारी गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. शहरांत रुपये पाच लाख किंवा सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सजा होऊ घातलेल्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, अशा खटल्यांसाठी पोलीस, वकील, अशिलांना ठाणे जिल्हा न्यायालयात धाव घ्यावी लागत होती. तेथे आधीच प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे न्याय मिळण्यास उशिर होत होता. शिवाय तिथे जाण्या-येण्यासाठी वेळ, इंधन, पैसा खर्चही होत होता. यामुळे ठाणे जिल्हा न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबईत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर स्थापन्याची मागणी होत होती, ती मान्य झाली आहे.

उच्च न्यायालयाच्या मानकानुसार प्रलंबित खटल्यांची संख्या किमान ५०० असावी, अशी अट आहे. नवी मुंबईत तर ही संख्या हजारोंच्या घरात आहे. शिवाय न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत, न्यायाधीशांसाठी निवासस्थाने असावीत, अशा अटी आहेत. त्यांची पूर्तता नवी मुंबईत पूर्ण होत असल्याने आता आवश्यक अधिकारी व कर्मचारी मिळणार असल्याने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवी मुंबईत जिल्हा व अतिरिक्त न्यायालय नसल्याने आम्हाला अशिलांना घेऊन वारंवार ठाणे येथे धाव घ्यावी लागत होती. मात्र, तिथे आधीच प्रलंबित खटल्यांची संख्या प्रचंड आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस ॲट डोअर या धोरणाला हरताळ फासला जात होता. न्याय मिळण्यास विलंब होत होता. परंतु नवी मुंबईतच जिल्हा व अतिरिक्त न्यायालय होणार असल्याने शहरवासीयांना त्याचा लाभ होईल. अशी माहिती ॲड. रमेश त्रिपाठी यांनी दिली. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCourtन्यायालय