शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

नवी मुंबईत न्यायाधीशांसह ४४ पदे निर्माण करण्यास मंजुरी; विधी व न्याय विभागाचा निर्णय

By नारायण जाधव | Updated: November 11, 2022 18:59 IST

नवी मुंबईत न्यायाधीशांसह ४४ पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  

नवी मुंबई : नवी मुंबईसारख्या वाढत्या नागरीकरण होत असलेल्या शहरांतील कनिष्ठ न्यायालयातील खटल्यांची संख्या तसेच फौजदारी आणि गुन्हेगारी खटल्यांचे प्रमाण पाहता उच्च न्यायालयाच्या न्यायालय स्थापना समितीने नवी मुंबईत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन्यास मान्यता दिल्यानंतर गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाने तशी मंजुरी दिली होती. मात्र, त्यासाठीचे न्यायाधीश आणि कर्मचारी उपलब्ध नव्हते. मात्र, आता राज्याच्या विधी व न्याय विभागाने या दोन्ही न्यायालयांसाठी न्यायाधीशांसह अधिकारी व कर्मचारी अशा ४४ पदांना मंजुरी दिली आहे. 

न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांना मंजुरी दिल्यानंतर नवी मुंबईतील वकील आणि अशिलांनी आनंद व्यक्त केला आहे. यात १९ पदे ही जिल्हा व अतिरिक्त न्यायालयासाठी, तर १६ पदे दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तरसाठीची आहेत. या पदांना ९ नोव्हेंबर रोजी मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाची पाच आणि दिवाणी न्यायालयाची ४ अशी ९ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरता येणार आहेत. नवी मुंबई राज्यातील सर्वाधिक नागरीकरण होणारे आणि औद्योगिक विकासासह आयटी पार्क असलेले शहर आहे.

 नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, टीटीसी औद्योगिक वसाहत यामुळे येथील लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने दिवाणी आणि फौजदारी गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. शहरांत रुपये पाच लाख किंवा सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सजा होऊ घातलेल्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, अशा खटल्यांसाठी पोलीस, वकील, अशिलांना ठाणे जिल्हा न्यायालयात धाव घ्यावी लागत होती. तेथे आधीच प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे न्याय मिळण्यास उशिर होत होता. शिवाय तिथे जाण्या-येण्यासाठी वेळ, इंधन, पैसा खर्चही होत होता. यामुळे ठाणे जिल्हा न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबईत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर स्थापन्याची मागणी होत होती, ती मान्य झाली आहे.

उच्च न्यायालयाच्या मानकानुसार प्रलंबित खटल्यांची संख्या किमान ५०० असावी, अशी अट आहे. नवी मुंबईत तर ही संख्या हजारोंच्या घरात आहे. शिवाय न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत, न्यायाधीशांसाठी निवासस्थाने असावीत, अशा अटी आहेत. त्यांची पूर्तता नवी मुंबईत पूर्ण होत असल्याने आता आवश्यक अधिकारी व कर्मचारी मिळणार असल्याने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवी मुंबईत जिल्हा व अतिरिक्त न्यायालय नसल्याने आम्हाला अशिलांना घेऊन वारंवार ठाणे येथे धाव घ्यावी लागत होती. मात्र, तिथे आधीच प्रलंबित खटल्यांची संख्या प्रचंड आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस ॲट डोअर या धोरणाला हरताळ फासला जात होता. न्याय मिळण्यास विलंब होत होता. परंतु नवी मुंबईतच जिल्हा व अतिरिक्त न्यायालय होणार असल्याने शहरवासीयांना त्याचा लाभ होईल. अशी माहिती ॲड. रमेश त्रिपाठी यांनी दिली. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCourtन्यायालय