शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गुजरातसह दमणवरून प्लॅस्टिकचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:11 IST

कारवाईतून झाले स्पष्ट : बंदीनंतरही व्यापाऱ्यांची प्लॅस्टिकलाच पसंती

- नामदेव मोरे

नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबई महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टिकविरोधात मोहीम तीव्र केली आहे. दुकानदारांवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. राज्यात गुजरात, दमण व भिवंडीमधून प्लॅस्टिक पिशव्या विक्रीसाठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवसायामध्ये मोठे रॅकेट असून, मूळ पुरवठादारांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

नवी मुंबई महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी मॅफ्को व बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये धाड टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. या वेळी जप्त केलेल्या प्लॅस्टिकवर दमण व भिवंडीमधील कंपनीचा लोगो छापण्यात आल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीही एपीएमसी मार्केट व वाशीतील मॉलमध्ये कारवाई केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनीही नवी मुंबईमध्ये गुजरातवरून प्लॅस्टिक विक्रीसाठी येत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती दिली होती. महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर बहुतांश कारखाने बंद करण्यात आले आहेत.भिवंडी व इतर काही ठिकाणी अद्याप चोरून प्लॅस्टिकचे उत्पादन केले जात आहे; परंतु बहुतांश पुरवठा हा गुजरात व दमणवरूनच येत असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी शासनाने गुटखाबंदी केल्यानंतरही उत्पादकांनी त्यांचे बस्तान शेजारील राज्यात सुरू केले व तेथून नवी मुंबईसह पनवेल व राज्यात विविध ठिकाणी पुरवठा सुरू केला आहे. एपीएमसी मार्केटमध्येही गुजरातवरूनच गुटखा विक्रीसाठी येत असतो. त्याचपद्धतीने आता प्लॅस्टिकचा पुरवठा करण्यासाठीही रॅकेट सक्रिय झाले आहे.

महानगरपालिका प्रशासन विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील साठा जप्त करत आहे. प्रत्येक दुकानदारांना पाच हजार रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम कमी असल्यामुळे व्यापारी बिनधास्तपणे पुन्हा विक्री सुरू करत आहेत. तुर्भे विभाग कार्यालयाने एपीएमसी परिसरामध्ये वारंवार धाडी टाकून अनेक दुकानदारांवर कारवाई केली आहे; परंतु या कारवाईचा काहीही परिणाम इतर विक्रेत्यांवर झालेला नाही. कारवाईनंतर दुसºयाच दिवशी पुन्हा प्लॅस्टिकविक्री केली जात आहे.

शहरात भाजी मंडईपासून ते मॉलपर्यंत सर्वत्रप्लॅस्टिकचा वापर सुरूच आहे. प्लॅस्टिकबंदी यशस्वीपणे राबवायची असल्यास यामधील मुख्य पुरवठादारांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.दिशाभूल करण्याचा प्रयत्नएपीएमसीजवळ केलेल्या कारवाईमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर भिवंडीचा पत्ता आढळून आला. पिशवीमधील निळ्या पिशव्यांची पाहणी केली असता, त्यामध्ये दमणचा लोगो आढळून आला आहे.

प्लॅस्टिकमधून फळे, भाजीची आवकबाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये गुजरातसह राजस्थानमधून प्लॅस्टिक पिशव्यांमधूनच माल येत असल्याचे निदर्शनास आले आहे. व्यापाºयांनी सूचना देऊनही परराज्यातील शेतकरी व पुरवठादार प्लॅस्टिकचाच वापर करत आहेत.

नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई केली आहे. जप्त केलेल्या प्लॅस्टिकपिशव्यांवर गुजरात, दमण, भिवंडीमधील पत्ते आढळून आले आहेत. यामुळे परराज्यातून माल विक्रीसाठी येत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.- राजेंद्र पाटील, उपप्रादेशिक अधिकारीएमपीसीबी, नवी मुंबई

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीGujaratगुजरात