शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ठाणे-बेलापूर मार्गावर अवैध पार्किंगचे पेव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:29 AM

ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर खासगी कंपन्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे

नवी मुंबई : ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर खासगी कंपन्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे. कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाºया बस रस्त्यालगत उभ्या केल्या जात आहेत, यामुळे अपघाताची शक्यता असतानाही वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीत कमालीची वाढ झाली आहे. त्यात जड, अवजड वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. यामुळे जागोजागी वाहतूककोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. त्याचा सर्वाधिक त्रास ऐरोलीकरांना सहन करावा लागत आहे. या त्रासातून ऐरोलीकरांची अद्याप महिनाभर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत, यामुळे वाहतूककोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानंतरही ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावरील खासगी कंपन्यांची अवैध पार्किंग हटवण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्या ठिकाणी दोन्ही दिशेच्या मार्गालगत खासगी कंपन्यांच्या बस उभ्या केल्या जात आहेत. तर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगच्या जागेतही बस उभ्या केल्या जात आहेत. यावरून परिसरातील खासगी कंपन्यांच्या बस पार्किंगसाठी रस्ते व रेल्वेस्थानकाची जागा प्रशासनाने आंदण दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे व कोपरखैरणे परिसरातही हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.नोकरी-व्यवसायानिमित्ताने नवी मुंबईत येणाºया कामगार वर्गाची संख्या मोठी आहे, यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळी ठाणे-बेलापूर मार्गावर रहदारी वाढलेली असते. अशा वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या खासगी कंपन्यांच्या बस व कार यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्या ठिकाणी अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खासगी कंपन्यांच्या ताब्यातून ठाणे-बेलापूर मार्गाची सुटका करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे; परंतु सर्वसामान्यांच्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणारे वाहतूक पोलीस खासगी कंपन्यांच्या बसवर का कारवाई करत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :thaneठाणेParkingपार्किंगroad transportरस्ते वाहतूक