शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

चांगल्या डॉक्टरांचा सल्ला मानला नाही तर घोटाळा होतो - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 05:28 IST

साथ सोडणाऱ्यांवर टीका : नवी मुंबईत केमिस्ट ब्लड बँकेचे उद्घाटन

नवी मुंबई : चांगल्या डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. मात्र, डॉक्टरांचा सल्ला मानला नाही तर घोटाळा होतो, अशी मिश्कील टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेतेमंडळीवर केली.

नवी मुंबई रिटेल केमिस्ट अ‍ॅण्ड होलसेलर्स असोसिएशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केमिस्ट ब्लड बँकेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी सानपाडा येथे झाले. या प्रसंगी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्रीछगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे, महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.

केमिस्ट ब्लड बँकेमुळे गरजू आणि गरीब नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. केमिस्ट असोसिएशनही संकटकाळात मदतीला धावून येणारी सेवाभावी संघटना आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला. तसेच आॅनलाइन औषधविक्री सुविधा देताना कोणत्या औषधांना परवानगी द्यावी, यासाठी नियम होण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारबरोबर लवकरच चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.खूप बोलायचे आहे; परंतु भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे येथे उपस्थित आहेत, त्यामुळे बोलत नाही; परंतु त्या आपल्याच आहेत, असे छगन भुजबळ या वेळी आपल्या भाषणात म्हणाले.

तर राज्यात दरवर्षी १३ लाख बाटल्या रक्ताची गरज असते. विविध ब्लड बँकेच्या माध्यमातून सध्या ११ लाख बाटल्या रक्त जमा होते. केमिस्ट ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्ताची गरज काही प्रमाणात पूर्ण होईल, असा विश्वास राजेंद्र शिंगणे यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी महापौर जयवंत सुतार यांचेही भाषण झाले.असोसिएशनचे सचिव सुनील छाजेड यांनी प्रस्ताविकपर भाषण केले. तर अनिल नामंदर यांनी केमिस्ट व्यावसायिकांना भेडसावणाºया समस्या मांडल्या.

याप्रसंगी आॅल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, माजी आमदार मिलिंद कांबळे, माथाडी नेते शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

छगन भुजबळ यांचा राज ठाकरेंना टोलामनसेने रविवारी बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी विराट मोर्चा काढला. या मोर्च्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मोर्चाला उत्तर मोर्चाने दिल्याचे स्पष्ट करीत या पुढे जास्त नाटक केल्यास दगडाला उत्तर दगडाने व तलवारीला उत्तर तलवारीने देऊ असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच ही लोकशाही आहे. त्यामुळे दगड आणि तलवारी आता जुन्या झाल्या आहेत. आता नवीन शस्त्र आली आहेत, असा टोला राज ठाकरे यांना लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGanesh Naikगणेश नाईक