शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई द्या; राज्य सरकार, सिडकोला उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:00 IST

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना कायदेशीर दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवी मुंबईविमानतळासाठी जवळपास ४० शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व सिडकोला पुन्हा एकदा दणका दिला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार आणि न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करून शेतकऱ्यांना २०१४ च्या नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत  भरपाई देण्याची टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकार आणि सिडकोला न्यायालयाने शेतकऱ्यांना नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे २०१५ च्या बाजारभावाने जमिनींचे संपादन करण्याचे निर्देश दिले. तसेच २० टक्के विकसित भूखंडांची मागणी करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर सिडकोला निर्णय घेण्याचे निर्देश दिले. नवी मुंबईविमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया २००७ पासून सुरू होती. मात्र, २०१५ मध्ये जमिनी ताब्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.  

सिडकोच्या निर्यणाविरोधात शेतकरी उच्च न्यायालात

दरम्यान, १ जानेवारी २०१४ रोजी नवीन भूसंपादन कायदा लागू केला. तरीही संबंधित ४० शेतकऱ्यांना जुन्या कायद्यानुसारच भरपाई देणार असल्याचे सरकार व सिडकोने जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

दोन वर्षांहून अधिक काळ

शेतकऱ्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अनिल अंतूरकर व राहुल ठाकूर यांनी युक्तिवाद केला. जुन्या कायद्यानुसार सरकारने भूसंपादन प्रक्रिया दोन वर्षात पूर्ण करावी लागते. मात्र, सरकारने दोन वर्षांहून अधिक काळ लावला. भूसंपादन करताना विभागीय आयुक्तांची परवानगी घेतली नाही. जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात २०१५ मध्ये जाहीर करून जुन्या कायद्यानुसार भरपाई देणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.  

‘तो’ नियम लागू होत नाही

सिडकोतर्फे ज्येष्ठ वकील जी. एस. हेगडे आणि पिंकी भन्साली यांनी युक्तिवाद केला.  भूसंपादन हे जुन्या कायद्यानुसार न करता एमआरटीपी कायद्यानुसार केले आहे.  त्यामुळे भूसंपादन दोन वर्षांत करण्याचा नियम या प्रकरणात लागू होत नाही. तसेच भूसंपादन करताना विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली, असा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालय काय म्हणाले?

  • सरकार व सिडकोने विभागीय आयुक्तांची नाही तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सही असलेल्या कागदपत्रांवरून जमिनी ताब्यात घेतल्याच्या निर्णयाची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. 
  • न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र तलाठी कविता माने यांनी दाखल केल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सिद्ध केली. या बाबींची न्या. एम. एस. सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने गांभीर्याने दखल घेतली. 
  • खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल करू शकतो असा संदेश जायला नको. भूसंपादन वाचविण्यासाठी सरकारने अनेक कागदपत्रांत फेरफार केला.
  • प्रसंगी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, असे म्हणत न्यायालयाने महसूल विभागाच्या सचिवांना कविता माने यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळMumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcidcoसिडको लॉटरी