शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई द्या; राज्य सरकार, सिडकोला उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:00 IST

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना कायदेशीर दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवी मुंबईविमानतळासाठी जवळपास ४० शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व सिडकोला पुन्हा एकदा दणका दिला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार आणि न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करून शेतकऱ्यांना २०१४ च्या नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत  भरपाई देण्याची टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकार आणि सिडकोला न्यायालयाने शेतकऱ्यांना नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे २०१५ च्या बाजारभावाने जमिनींचे संपादन करण्याचे निर्देश दिले. तसेच २० टक्के विकसित भूखंडांची मागणी करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर सिडकोला निर्णय घेण्याचे निर्देश दिले. नवी मुंबईविमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया २००७ पासून सुरू होती. मात्र, २०१५ मध्ये जमिनी ताब्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.  

सिडकोच्या निर्यणाविरोधात शेतकरी उच्च न्यायालात

दरम्यान, १ जानेवारी २०१४ रोजी नवीन भूसंपादन कायदा लागू केला. तरीही संबंधित ४० शेतकऱ्यांना जुन्या कायद्यानुसारच भरपाई देणार असल्याचे सरकार व सिडकोने जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

दोन वर्षांहून अधिक काळ

शेतकऱ्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अनिल अंतूरकर व राहुल ठाकूर यांनी युक्तिवाद केला. जुन्या कायद्यानुसार सरकारने भूसंपादन प्रक्रिया दोन वर्षात पूर्ण करावी लागते. मात्र, सरकारने दोन वर्षांहून अधिक काळ लावला. भूसंपादन करताना विभागीय आयुक्तांची परवानगी घेतली नाही. जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात २०१५ मध्ये जाहीर करून जुन्या कायद्यानुसार भरपाई देणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.  

‘तो’ नियम लागू होत नाही

सिडकोतर्फे ज्येष्ठ वकील जी. एस. हेगडे आणि पिंकी भन्साली यांनी युक्तिवाद केला.  भूसंपादन हे जुन्या कायद्यानुसार न करता एमआरटीपी कायद्यानुसार केले आहे.  त्यामुळे भूसंपादन दोन वर्षांत करण्याचा नियम या प्रकरणात लागू होत नाही. तसेच भूसंपादन करताना विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली, असा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालय काय म्हणाले?

  • सरकार व सिडकोने विभागीय आयुक्तांची नाही तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सही असलेल्या कागदपत्रांवरून जमिनी ताब्यात घेतल्याच्या निर्णयाची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. 
  • न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र तलाठी कविता माने यांनी दाखल केल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सिद्ध केली. या बाबींची न्या. एम. एस. सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने गांभीर्याने दखल घेतली. 
  • खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल करू शकतो असा संदेश जायला नको. भूसंपादन वाचविण्यासाठी सरकारने अनेक कागदपत्रांत फेरफार केला.
  • प्रसंगी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, असे म्हणत न्यायालयाने महसूल विभागाच्या सचिवांना कविता माने यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळMumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcidcoसिडको लॉटरी