शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 02:23 IST

दहावीसाठी शिकवणी वर्ग : शाळेसाठी तीन वर्गखोल्याही बांधल्या

नवी मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्र मगड तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयीन तरु णांनी पुढाकार घेतला असून बेलापूर येथील पारसिक हिल येथे गेल्या एक महिन्यापासून शैक्षणिक तसेच योगसारखे उपक्र म शिकविले जात आहेत. नित्य सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील एका शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे.

आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्यल्प सुविधा आणि मार्गदर्शनाचा अभाव असतो त्यामुळे त्यांना दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन व्हावे यासाठी काही तरु णांनी एकत्र येत एक अभिनव संकल्पना राबविली आहे. जयेश किरंगे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह विक्र मगड आणि वाडा तालुक्यातील साखरे, असनास, खैरे अंबावली आणि वाकी या चार गावातील आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गेल्या शैक्षणिक वर्षात शाळेत जाऊन प्रत्येक विषयाचा अभ्यास करवून घेतला. अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले. यादरम्यान आदिवासी पाड्यात सुविधांचा अभाव आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे भवितव्य घडू शकते याची जाणीव किरंगे यांना झाल्याने नित्य सार्थी फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरु वातीपासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मात असलेल्या विविध विषयाचे मार्गदर्शन व्हावे यासाठी सुमारे ५0 विद्यार्थ्यांना बेलापूर येथील पारसिक हिल येथे आणण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाºया पाच विषयांचा अभ्यास गेल्या महिनाभरापासून करून घेतला जात आहे. शिक्षणाबरोबर या विद्यार्थ्यांना योग व इंग्रजी बोलणे शिकविले जात आहे. सामाजिक कार्यासाठी बांद्रा शैक्षणिक ट्रस्टमधील शिवम कापडिया, मेघा मोधा, तनिषा शिंदे,आकांक्षा राठोड, कांची शाह, अमोघ तेलंग, सनी भावसार, कृपा शाह, प्रीती आणि आयुष गोयंका आदी विद्यार्थी फाउंडेशनमध्ये स्वयंसेवक म्हणून सक्रि य झाले आहेत.आदिवासी पाड्यात पाणी प्रकल्पच्आदिवासी पाड्यातील महिला आणि लहान मुलींना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यासाठी दिवसाला अनेक तास वाया जातात. फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मदतीने गावापासून दीड किलोमीटर अंतरावर एक विहीर खोदून बांधकाम करण्यात आले. विहिरीत सौर ऊर्जेवर चालणारी मोटार बसवून पाइपलाइनच्या साहाय्याने गावात ५000 लीटरची पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळा