शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेशासाठी मदतकेंद्र सुरू, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:59 IST

आरटीईअंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया प्रभावी राबवण्यात महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून निष्काळजीपणा होत होता. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने मदत केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नवी मुंबई - आरटीईअंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया प्रभावी राबवण्यात महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून निष्काळजीपणा होत होता. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने मदत केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार काही दिवसांत सुरू होणाºया आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकांच्या शंकांचे निराकरण होण्यास मदत मिळणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९नुसार २५ टक्के प्रवेश कोटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवला जातो. त्याकरिता पात्र पालकांनी त्यांच्या पाल्याचे अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन भरायचे आहेत. या प्रक्रियेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, त्याकरिता शिक्षण विभागाकडून पालकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. तशा शासनाच्याही सूचना आहेत; परंतु त्याकडे पालिकेचे शिक्षण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते. त्यामागे खासगी शाळांचा हेतू साध्य करण्याचा उद्देश असल्याचा आरोप नागरिकांकडून होत होता. तर मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनीही शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.आरटीई अंतर्गतच्या राखीव जागा खासगी शाळांकडून डोनेशनच्या नावाखाली भरभक्कम रक्कम घेऊन भरल्या जाण्याची शक्यता असते. यामुळे आरटीईबाबत जनजागृती आवश्यक असतानाच, शाळांच्या नोंदणी सुरू असतानाही पालिकेच्या शिक्षण मंडळाने २२ जानेवारीलाच प्रसिद्धिपत्रक काढून प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र संकेतस्थळावर लॉगिन होत नसल्याने पालकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. शिवाय शाळांच्या बाहेर आरटीईअंतर्गतच्या राखीव कोट्याची माहिती लावणे, नोंदणी प्रक्रियेबाबत पालकांमध्ये जनजागृती करणे, आवश्यक असतानाही त्याला बगल दिली होती. यासंदर्भातचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच झोपी गेलेल्या शिक्षण मंडळाला जाग आली आहे. वृत्तानंतर सुधारित प्रसिद्धिपत्रक काढून आॅनलाइन नोंदणी सुरू नसल्याचे सांगत, पालकांच्या मार्गदर्शनासाठी दहा ठिकाणी मदतकेंद्र सुरू केल्याची माहिती दिली आहे.सकाळी १० ते १ व दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यापैकी १० ते १ या वेळेत नेरुळ विभागात पालिका शाळा क्रमांक १, शिरवणे विभागात शाळा क्रमांक १५, घणसोली विभागात शाळा क्रमांक ४२, दिघा विभागात शाळा क्रमांक ५२ व कारकरीपाडा येथील शाळा क्रमांक ५५चा समावेश आहे. तर दुपारी २ ते ५.३० वेळेत चालणाºया केंद्रात तुर्भे इंदिरानगर येथील शाळा क्रमांक २०, वाशी विभागात शाळा क्रमांक २८, कोपरखैरणेतील शाळा क्रमांक ३१, ऐरोलीतील शाळा क्रमांक ४८ व कोपरखैरणेतील शाळा क्रमांक ३८चा समावेश आहे. त्याशिवाय सीबीडी येथील पालिका मुख्यालयातील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातूनही पालकांच्या शंकांचे निराकरण केले जाणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाNavi Mumbaiनवी मुंबई