शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आरटीईच्या प्रवेशासाठी मदतकेंद्र सुरू, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:59 IST

आरटीईअंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया प्रभावी राबवण्यात महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून निष्काळजीपणा होत होता. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने मदत केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नवी मुंबई - आरटीईअंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया प्रभावी राबवण्यात महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून निष्काळजीपणा होत होता. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने मदत केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार काही दिवसांत सुरू होणाºया आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकांच्या शंकांचे निराकरण होण्यास मदत मिळणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९नुसार २५ टक्के प्रवेश कोटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवला जातो. त्याकरिता पात्र पालकांनी त्यांच्या पाल्याचे अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन भरायचे आहेत. या प्रक्रियेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, त्याकरिता शिक्षण विभागाकडून पालकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. तशा शासनाच्याही सूचना आहेत; परंतु त्याकडे पालिकेचे शिक्षण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते. त्यामागे खासगी शाळांचा हेतू साध्य करण्याचा उद्देश असल्याचा आरोप नागरिकांकडून होत होता. तर मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनीही शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.आरटीई अंतर्गतच्या राखीव जागा खासगी शाळांकडून डोनेशनच्या नावाखाली भरभक्कम रक्कम घेऊन भरल्या जाण्याची शक्यता असते. यामुळे आरटीईबाबत जनजागृती आवश्यक असतानाच, शाळांच्या नोंदणी सुरू असतानाही पालिकेच्या शिक्षण मंडळाने २२ जानेवारीलाच प्रसिद्धिपत्रक काढून प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र संकेतस्थळावर लॉगिन होत नसल्याने पालकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. शिवाय शाळांच्या बाहेर आरटीईअंतर्गतच्या राखीव कोट्याची माहिती लावणे, नोंदणी प्रक्रियेबाबत पालकांमध्ये जनजागृती करणे, आवश्यक असतानाही त्याला बगल दिली होती. यासंदर्भातचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच झोपी गेलेल्या शिक्षण मंडळाला जाग आली आहे. वृत्तानंतर सुधारित प्रसिद्धिपत्रक काढून आॅनलाइन नोंदणी सुरू नसल्याचे सांगत, पालकांच्या मार्गदर्शनासाठी दहा ठिकाणी मदतकेंद्र सुरू केल्याची माहिती दिली आहे.सकाळी १० ते १ व दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यापैकी १० ते १ या वेळेत नेरुळ विभागात पालिका शाळा क्रमांक १, शिरवणे विभागात शाळा क्रमांक १५, घणसोली विभागात शाळा क्रमांक ४२, दिघा विभागात शाळा क्रमांक ५२ व कारकरीपाडा येथील शाळा क्रमांक ५५चा समावेश आहे. तर दुपारी २ ते ५.३० वेळेत चालणाºया केंद्रात तुर्भे इंदिरानगर येथील शाळा क्रमांक २०, वाशी विभागात शाळा क्रमांक २८, कोपरखैरणेतील शाळा क्रमांक ३१, ऐरोलीतील शाळा क्रमांक ४८ व कोपरखैरणेतील शाळा क्रमांक ३८चा समावेश आहे. त्याशिवाय सीबीडी येथील पालिका मुख्यालयातील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातूनही पालकांच्या शंकांचे निराकरण केले जाणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाNavi Mumbaiनवी मुंबई