शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रोडपालीत अवजड वाहनांची पार्किंग, रहिवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:02 IST

कळंबोलीसह रोडपाली परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कळंबोलीसह रोडपाली परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे. ट्रक, टेम्पो आणि कंटेनरसारखी वाहने इमारतींच्या अगदी प्रवेशद्वारावर बेकायदा पार्क केली जात असल्याने रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.कळंबोलीजवळ रोडपाली गावालगत नागरी वस्ती वाढली आहे. सिडकोच्या माध्यमातून येथे सेक्टर्स निर्माण केले आहेत. खारघरप्रमाणेच येथेसुद्धा विस्तीर्ण रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु बेकायदा पार्किंगमुळे या सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. रस्त्यांवर दोन्ही बाजूने अवजड वाहने उभी केली जातात. त्यामध्ये ट्रक, टँकर आणि कंटेनर यांचे प्रमाण जास्त आहे. बाजूलाच स्टील मार्के ट असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने या भागात येतात. यातील बहुतांशी वाहने शेजारच्या नागरी वसाहतीत पार्क केली जात आहेत. विशेष म्हणजे, याच वसाहतीत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक, चालक तसेच वाहक राहत असल्याने आपली वाहने घराजवळ पार्क करण्याचा कल वाढला आहे. वसाहतीतील रस्ते अरुंद असल्याने या अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीचा त्रास होत आहे.नागरी वसाहतीत अवजड वाहनांना बंदी आहेत. त्यासाठी सिडकोने ठिकठिकाणी हाइट गेज लावले आहेत. मात्र, हे हाइट गेज तोडून वाहनचालक सर्रासपणे वाहने वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर पार्क करीत असल्याचे दिसून येते. कळंबोली सेक्टर १० ई परिसरातील परिस्थिती अत्यंत संतापजनक आहे. येथील रस्त्यांना पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने उभी केली जात आहेत. अनेक भागात इमारतींच्या अगदी प्रवेशद्वारावर वाहने उभी केली जात असल्याने रहिवाशांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांना आपल्या दुचाकीही बाहेर काढतानाही कसरत करावी लागत आहे. गाड्यांचा दिवसरात्र कर्कश आवाज, धूर, हॉर्नचा गोंगाट आदीमुळे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात रहिवाशांच्या वतीने अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कोणतीही कारवाई झाली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.कळंबोलीच्या सेक्टर १७ मध्येही कमी-अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील मोकळ्या जागांवर बेकायदा पे अ‍ॅण्ड पार्किंगसुद्धा सुरू करण्यात आले आहे. या प्रकाराकडेही संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.मद्यपी चालकांचा उच्छादरस्त्यावर आणि मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे अवजड वाहने उभी केली जातात. या वाहनांचे चालक व वाहक येथेच जेवण बनवतात. रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी सर्रासपणे दारूच्या पार्टी चालतात. अनेकदा त्यांच्यात मोठमोठ्याने भांडणे होतात. या प्रकारामुळे परिसरातील महिलांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अवघड झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.स्वच्छ भारत अभियानाचा बोजवाराआपली अवजड वाहने रस्त्यावर बेकायदेशीर पार्क करून चालक आणि वाहक त्यातच राहतात. आंघोळ, प्रात:विधी तसेच जेवण आदी दैनंदिन क्रिया उघड्यावरच केल्या जातात. त्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली जात आहे. ट्रक व कंटेनरचालकांच्या या उच्छादामुळे परिसरातील स्वच्छतेला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छ शहर अभियानाला हरताळ फासला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी