शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:13 IST

नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती.

नवी मुंबईनवी मुंबई शहरात दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, चोवीस तासांत सुमारे १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर, वाशी विभागात एक झाड कोसळले.नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. शुक्रवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला होता. या पावसात वाशी विभागातील एक झाड कोसळले असून, दिवा गाव परिसरात आग लागल्याची एक दुर्घटना घडली. शनिवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती. दुपारी काही काळ पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, संध्याकाळी पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली होती. शहरातील विविध नोडमध्ये २४ तासांत शनिवारी दुपारपर्यंत १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, यामध्ये वाशी विभागात सर्वाधिक १६४.१० मिमी पाऊस पडला आहे. कोपरखैरणे विभागात १६३.०५ मिमी, बेलापूर १४३.०६ मिमी, ऐरोली १४१.४ मिमी तर नेरुळ विभागात १३५.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.वाशीत खड्ड्यामुळे रिक्षा उलटलीशहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाशी विभागात रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाचे चाक खड्ड्यात अडकल्याने रिक्षा पलटी झाल्याची दुर्घटना घडली.उरणला पावसाने झोडपलेदोन दिवसांपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांना झोडपून काढले आहे.उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, वैष्णवी हॉटेल,आपला बाजार,साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका परिसरातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. उरण परिसरातील जेएनपीटी- नवघर, द्रोणागिरी आणि परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे मात्र वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले होते.मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळित झाले आहे.पनवेलमध्ये १८०मिमी पावसाची नोंदपनवेलमध्ये शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दोन दिवसांत १८० मिमी पावसाची नोंद झाली, या वर्षी आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसाने गाढी, कासाडी या नद्या तुडुंब वाहत असल्या, तरी दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली नसल्याचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट झाले. दरम्यान, शनिवारी पावसाने थोड्या-थोड्या वेळाने उसंत घेतल्याने कोठेही पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली नाही.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई