शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:13 IST

नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती.

नवी मुंबईनवी मुंबई शहरात दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, चोवीस तासांत सुमारे १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर, वाशी विभागात एक झाड कोसळले.नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. शुक्रवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला होता. या पावसात वाशी विभागातील एक झाड कोसळले असून, दिवा गाव परिसरात आग लागल्याची एक दुर्घटना घडली. शनिवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती. दुपारी काही काळ पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, संध्याकाळी पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली होती. शहरातील विविध नोडमध्ये २४ तासांत शनिवारी दुपारपर्यंत १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, यामध्ये वाशी विभागात सर्वाधिक १६४.१० मिमी पाऊस पडला आहे. कोपरखैरणे विभागात १६३.०५ मिमी, बेलापूर १४३.०६ मिमी, ऐरोली १४१.४ मिमी तर नेरुळ विभागात १३५.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.वाशीत खड्ड्यामुळे रिक्षा उलटलीशहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाशी विभागात रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाचे चाक खड्ड्यात अडकल्याने रिक्षा पलटी झाल्याची दुर्घटना घडली.उरणला पावसाने झोडपलेदोन दिवसांपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांना झोडपून काढले आहे.उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, वैष्णवी हॉटेल,आपला बाजार,साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका परिसरातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. उरण परिसरातील जेएनपीटी- नवघर, द्रोणागिरी आणि परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे मात्र वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले होते.मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळित झाले आहे.पनवेलमध्ये १८०मिमी पावसाची नोंदपनवेलमध्ये शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दोन दिवसांत १८० मिमी पावसाची नोंद झाली, या वर्षी आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसाने गाढी, कासाडी या नद्या तुडुंब वाहत असल्या, तरी दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली नसल्याचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट झाले. दरम्यान, शनिवारी पावसाने थोड्या-थोड्या वेळाने उसंत घेतल्याने कोठेही पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली नाही.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई