शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:13 IST

नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती.

नवी मुंबईनवी मुंबई शहरात दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, चोवीस तासांत सुमारे १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर, वाशी विभागात एक झाड कोसळले.नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. शुक्रवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला होता. या पावसात वाशी विभागातील एक झाड कोसळले असून, दिवा गाव परिसरात आग लागल्याची एक दुर्घटना घडली. शनिवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती. दुपारी काही काळ पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, संध्याकाळी पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली होती. शहरातील विविध नोडमध्ये २४ तासांत शनिवारी दुपारपर्यंत १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, यामध्ये वाशी विभागात सर्वाधिक १६४.१० मिमी पाऊस पडला आहे. कोपरखैरणे विभागात १६३.०५ मिमी, बेलापूर १४३.०६ मिमी, ऐरोली १४१.४ मिमी तर नेरुळ विभागात १३५.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.वाशीत खड्ड्यामुळे रिक्षा उलटलीशहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाशी विभागात रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाचे चाक खड्ड्यात अडकल्याने रिक्षा पलटी झाल्याची दुर्घटना घडली.उरणला पावसाने झोडपलेदोन दिवसांपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांना झोडपून काढले आहे.उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, वैष्णवी हॉटेल,आपला बाजार,साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका परिसरातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. उरण परिसरातील जेएनपीटी- नवघर, द्रोणागिरी आणि परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे मात्र वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले होते.मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळित झाले आहे.पनवेलमध्ये १८०मिमी पावसाची नोंदपनवेलमध्ये शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दोन दिवसांत १८० मिमी पावसाची नोंद झाली, या वर्षी आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसाने गाढी, कासाडी या नद्या तुडुंब वाहत असल्या, तरी दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली नसल्याचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट झाले. दरम्यान, शनिवारी पावसाने थोड्या-थोड्या वेळाने उसंत घेतल्याने कोठेही पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली नाही.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई