शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

प्रदूषणकारी कंपन्यांमुळे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:43 PM

तळोजासह ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : तळोजासह ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे कासाडी नदीसह खाडीतील प्रदूषणामध्ये वाढ होऊन तेथील जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई होत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईसह पनवेलमधील प्रदूषणाचा विषय गंभीर झाला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये ठाणे बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणावर स्थानिक आमदारांनी लक्षवेधी मांडली. शासनानेही कारखान्यांकडून प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आहे. सर्वात गंभीर स्थिती तळोजामधील आहे. २०१७ च्या तपशीलाप्रमाणे ३६५ कारखान्यांची सीईटीपीला जोडणीच झाली नसल्याने तेथील प्रदूषित पाणी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने १५७ कारखाने प्रदूषित असल्याने सांगून ९३ कारखान्यांना नोटीस देण्यात आली असून ४ कारखाने बंद करण्याच्या नोटीस दिल्या होत्या.नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही तळोजामध्ये प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आहे. प्रदूषणामुळे ७२ कंपन्या बंद, ६३ कारखान्यांना नोटीस देण्यात आली असून १०० कंपन्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनीही आॅक्टोबर २०१७ मध्ये हरित लवादाकडे तक्रार केली आहे. लवादानेही प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. याविषयी पुढील सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल करण्यात आली आहे. दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप अनेक कारखान्यातील पाणी कासाडी नदीमध्ये सोडले जात आहे.ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील पाणीही अनेक वेळा नाल्यामध्ये सोडले जात आहे. कोपरखैरणे, कोपरी व जुईनगर नाल्यामध्ये दूषित पाणी सोडले जाते. पाऊस जास्त झाला की कारखान्यातील दूषित पाणीही नाल्यात सोडले जाते. एमआयडीसीने पावणे येथे एचटीपी केंद्र उभारले आहे. परंतु येथील यंत्रणा जुनी झाली असल्यामुळे योग्यपद्धतीने पाण्यावर प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया केलेले पाणी पाइपद्वारे खाडीमध्ये सोडले जात आहे. परंतु पाइप जुनी झाली असल्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू आहे. अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठविल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योजकांची बैठक घेऊन पाइपची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमआयडीसीमधील हवा प्रदूषण कमी झाले असले तरी जलप्रदूषण काही प्रमाणात सुरू असल्याची माहितीही अधिकाºयांनी दिली. नगरसेविका दिव्या गायकवाड २०१७ पासून प्रदूषण करणाºया कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करत असून प्रशासन योग्यपद्धतीने प्रतिसाद देत नसल्यामुळे हरित लवादाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.>हरित लवादाचा आदेशदेशभरातील प्रदूषणकारी उद्योग येत्या तीन महिन्यांत बंद करा, असा आदेश केंद्रीय हरित लवादाने १६ जुलैला दिला आहे. विकासाच्या नावाखाली आम्ही उद्योगांना नागरिकांच्या जीवाशी खेळू देणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये जे कारखानदार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत, ज्यांना बंदीचे आदेश हरित लवादाने दिले आहेत, ते आता बंद करणार का? याविषयी उत्सुकता आहे.>कासाडीला नाल्याचे स्वरूपतळोजातील कारखान्यांच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका कासाडी नदीला बसला आहे. नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. रसायनमिश्रीत पाणी सोडल्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश पगडे व इतरांनी नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी चळवळ उभी केली आहे. दूषित पाणी सोडणे थांबविले नाही तर कासाडीमधील जैवविविधतेचे अस्तित्व संपण्याची शक्यता आहे.>तळोजातील कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. २०१७ मध्ये हरित लवादाकडे तक्रार केली. लवादानेही नोटीस व सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाºया कारखान्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.- अरविंद म्हात्रे, नगरसेवक, पनवेल>नवी मुंबईमधील प्रदूषणाविषयी २०१७ पासून पाठपुरावा करत आहोत. प्रशासन कडक कारवाई करत नाही. यामुळे आम्ही लवकरच हरित लवादाकडे दाद मागणार आहोत.- वैभव गायकवाड,माजी नगरसेवक