शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हापूस सामान्यांच्या आवाक्यात कधी येणार?; किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते २००० रुपये डझन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:04 IST

बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा व्यापारातून ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असते.

- नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सरासरी ७० हजार पेक्षा जास्त पेट्यांची आवक सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ३०० ते ९०० रुपये डझन तर किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते २००० रुपये दराने विक्री होत आहे. एप्रिलमध्ये आवक कमी होणार असल्यामुळे यंदा हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहण्याची अधिक शक्यता आहे. 

बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा व्यापारातून ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असते. यंदा आंबा हंगाम लवकर सुरू झाला आहे. गुरुवारी रामनवमी असूनही हापूसच्या ४३,६२२ व इतर आंब्याच्या २९ हजार ६९९ अशा एकूण ७३ हजार २९१ पेट्यांची आवक झाली.  प्रतिदिन ७० हजारांहून अधिक पेट्यांची आवक सुरू आहे. सर्वाधिक आवक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू आहे.

एप्रिलमध्ये रत्नागिरीमधील आवक वाढणार आहे.  होलसेल मार्केटमध्ये ४ ते ८ डझन पेटीला १५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. प्रतिडझन ३०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. मुंबई, नवी मुंबईच्या किरकोळ मार्केटमध्ये हापूस ७०० पासून २००० रुपये दराने विकला जात आहे. 

५ एप्रिलनंतर महिनाभर आवक कमी?

५ एप्रिलनंतर महिनाभर आंब्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे.  यावर्षी हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे महिन्यात आवक वाढली तरच दर नियंत्रणात येऊ शकतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की आंबा हंगाम तेजीत आहे. कोकणच्या हापूससह दक्षिणेतील राज्यातून आंब्याची आवक सुरू आहे. यावर्षी मे महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई