शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

शिक्षणक्षेत्रातही आता सरकारची असहिष्णुता, शिक्षणमंत्र्यांना आले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 04:40 IST

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी बालरक्षक ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने बालरक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले.

मुंबई : शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी बालरक्षक ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने बालरक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले. मात्र केवळ सरकारशी जमत नाही म्हणून काही शिक्षणतज्ज्ञांना मार्गदर्शक यादीतून विद्या प्राधिकरणाने वगळल्याचा प्रकार शिक्षण विभागात घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात अशी असहिष्णुता का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना या प्रकाराबाबत पत्र लिहून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागासमोर शाळाबाह्य मुलांचा प्रश्न हा महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून बालरक्षकांची योजना आखण्यात आली आहे. त्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची एक समितीही तयार करण्यात आली. ज्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे नावही होते. मात्र शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत हेरंब कुलकर्णी यांनी याआधीही प्रश्न मांडून सरकारवर टीका केली होती. या कारणाने ऐनवेळी त्यांचे नाव मार्गदर्शक यादीतून कमी करण्यात आल्याची माहिती त्यांना मंत्रालयातून मिळाली. शाळाबाह्य सर्वेक्षण विषयावर मी सतत टीका केली ते लक्षात ठेवून टीका करणाऱ्यांना बोलवायचे नाही अशी ही मानसिकता लोकशाहीविरोधी असल्याची प्रतिक्रिया हेरंब कुलकर्णी यांनी दिली. मतभेद असणाºया व्यक्तींना शिक्षण विभागात कसे दूर ठेवले जाते याचे हे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.चौकशीची मागणीच्यानिमित्ताने शिक्षणक्षेत्रात असहिष्णुता कधीपासून सुरू झाली, अशी चर्चा शिक्षणतज्ज्ञच करीत आहेत. यासंदर्भात हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवून या प्रकाराची चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. यावर विनोद तावडे यांनी उत्तर देऊन याची चौकशी करतो व आपल्या बाबतीत असहिष्णुता हा मुद्दा नाही, असे उत्तर दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEducation Sectorशिक्षण क्षेत्र