शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणक्षेत्रातही आता सरकारची असहिष्णुता, शिक्षणमंत्र्यांना आले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 04:40 IST

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी बालरक्षक ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने बालरक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले.

मुंबई : शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी बालरक्षक ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने बालरक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले. मात्र केवळ सरकारशी जमत नाही म्हणून काही शिक्षणतज्ज्ञांना मार्गदर्शक यादीतून विद्या प्राधिकरणाने वगळल्याचा प्रकार शिक्षण विभागात घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात अशी असहिष्णुता का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना या प्रकाराबाबत पत्र लिहून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागासमोर शाळाबाह्य मुलांचा प्रश्न हा महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून बालरक्षकांची योजना आखण्यात आली आहे. त्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची एक समितीही तयार करण्यात आली. ज्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे नावही होते. मात्र शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत हेरंब कुलकर्णी यांनी याआधीही प्रश्न मांडून सरकारवर टीका केली होती. या कारणाने ऐनवेळी त्यांचे नाव मार्गदर्शक यादीतून कमी करण्यात आल्याची माहिती त्यांना मंत्रालयातून मिळाली. शाळाबाह्य सर्वेक्षण विषयावर मी सतत टीका केली ते लक्षात ठेवून टीका करणाऱ्यांना बोलवायचे नाही अशी ही मानसिकता लोकशाहीविरोधी असल्याची प्रतिक्रिया हेरंब कुलकर्णी यांनी दिली. मतभेद असणाºया व्यक्तींना शिक्षण विभागात कसे दूर ठेवले जाते याचे हे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.चौकशीची मागणीच्यानिमित्ताने शिक्षणक्षेत्रात असहिष्णुता कधीपासून सुरू झाली, अशी चर्चा शिक्षणतज्ज्ञच करीत आहेत. यासंदर्भात हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवून या प्रकाराची चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. यावर विनोद तावडे यांनी उत्तर देऊन याची चौकशी करतो व आपल्या बाबतीत असहिष्णुता हा मुद्दा नाही, असे उत्तर दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEducation Sectorशिक्षण क्षेत्र