शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या!, पनवेल तहसीलवर सेनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 03:00 IST

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, पीक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व संपूर्ण कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी

पनवेल : अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, पीक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व संपूर्ण कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी पनवेल तहसील कार्यालयावर शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी मोर्चा काढला व पनवेल तहसीलदारांना निवेदन दिले.राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. राज्यपालांनी तुटपुंजी मदत जाहीर करू शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप शिवसेनेने आपल्या निवेदनात केलाआहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. याचा सामना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.पनवेल तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाºयांमार्फत नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संबंधित सर्वेक्षणात वेळ वाया न घालवता शेतकºयांना नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती घोषित करून हेक्टरी २५ हजार रुपये तसेच मच्छिमारांना नवीन बोटी बांधण्यास आर्थिक मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात आली.जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी, सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण राज्यात मोर्चे काढण्यात आले आहेत. त्यादृष्टीने पनवेलमध्ये सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा सल्लागार बबन पाटील, तालुका संघटक भरत पाटील, दीपक निकम, गुरुनाथ पाटील आदी उपस्थित होते.शेतकरी, मच्छीमारांची उरण तहसील कार्यालयावर धडकअवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम, संपूर्ण कर्जमाफी, अंतर्गत शेतक-यांना तातडीने मदत मिळावी, पिकांना व फळबागांना हेक्टरी २५०००/- रुपये तसेच मच्छीमारांनाही नुकसान भरपाईसह नवीन बोटी बांधण्यास आर्थिक मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी उरण तहसील कार्यालयावर सेनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात बहुसंखेने उरण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक बहुसंख्येने सहभागी होते.२अवकाळी पावसामुळे उरणमध्ये हजारो शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे मासेमारी संकटात आली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांना लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात उपजिल्हाप्रमुख नरेश राहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख जे.पी.म्हात्रे, तालुका संघटक बी.एन.डाकी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य हिराजी घरत, शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, जिल्हा प्रमुख रमेश म्हात्रे, उरण तालुका महिला संघटक भावना म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.रायगडमधील आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नपनवेल तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. मोर्चात सत्तास्थापनेच्या राजकारणावरच चर्चा सुरू होती. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत रायगडमधील आमदारांना गळ टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बबन पाटील यांनी केला.आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्याशी रवींद्र्र चव्हाण यांनी संपर्कसाधल्याचे प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी या वेळी केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी