शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:20 IST

घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे.

नवी मुंबई : घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे. ठिकठिकाणी तडे गेले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.घणसोली गाव, नोड आणि तळवलीला जोडणारा सध्या हा एकमेव पूल आहे. घणसोली ते ऐरोली पामबीच मार्गाचे काम खारफुटीमुळे रखडले आहे, त्यामुळे सध्या चार ते पाच कि.मी. लांबीच्या या एकमेव पुलाचा वापर होत आहे. हलक्या वाहनांसह अवजड वाहनेसुद्धा याच पुलावरून जा-ये करतात, त्यामुळे पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्लॅब निखळले आहेत, भिंती मोडकळीस आल्या आहेत. अगदी जीर्ण अवस्थेत असलेल्या या पुलावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे, त्यामुळे दिवसेंदिवस हा पूल खचताना दिसत आहे. पुलाच्या भिंतीचे प्लॅस्टर कोसळल्याने गंजलेल्या व तुटलेल्या लोखंडी तारा स्पष्टपणे दिसत आहेत. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने अलीकडेच निविदा काढल्याची माहिती स्थानिक नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी ‘लोकमत’ला दिली. दिवाळीपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. त्याचबरोबर येथील रस्त्याचेही डांबरीकरण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.>महापालिकेचे दुर्लक्षकोपरखैरणे मार्गाने घणसोली आणि पुढे तळवलीकडे जाण्यासाठी हा एकमेव जुना पूल आहे, त्यामुळे बहुतांशी वाहनधारक याच पुलाचा वापर करतात. विशेष म्हणजे, या पुलापर्यंत जाणारा रस्ताही कच्चा आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कामही रखडले आहे. त्यावर दिवाबत्तीची सुविधा नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांची कसरत होत आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पुलाची नियमित डागडुजी केल्यास घणसोली आणि तळवलीला जोडणारा हा एक कायमस्वरूपी पर्याय होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.>हा पूल पुढे खाडीला मिळतो; परंतु पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे, तसेच त्यात मेलेली कुत्री, डुकरे टाकून दिली आहेत, तसेच या घाणीत उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.