शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:20 IST

घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे.

नवी मुंबई : घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे. ठिकठिकाणी तडे गेले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.घणसोली गाव, नोड आणि तळवलीला जोडणारा सध्या हा एकमेव पूल आहे. घणसोली ते ऐरोली पामबीच मार्गाचे काम खारफुटीमुळे रखडले आहे, त्यामुळे सध्या चार ते पाच कि.मी. लांबीच्या या एकमेव पुलाचा वापर होत आहे. हलक्या वाहनांसह अवजड वाहनेसुद्धा याच पुलावरून जा-ये करतात, त्यामुळे पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्लॅब निखळले आहेत, भिंती मोडकळीस आल्या आहेत. अगदी जीर्ण अवस्थेत असलेल्या या पुलावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे, त्यामुळे दिवसेंदिवस हा पूल खचताना दिसत आहे. पुलाच्या भिंतीचे प्लॅस्टर कोसळल्याने गंजलेल्या व तुटलेल्या लोखंडी तारा स्पष्टपणे दिसत आहेत. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने अलीकडेच निविदा काढल्याची माहिती स्थानिक नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी ‘लोकमत’ला दिली. दिवाळीपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. त्याचबरोबर येथील रस्त्याचेही डांबरीकरण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.>महापालिकेचे दुर्लक्षकोपरखैरणे मार्गाने घणसोली आणि पुढे तळवलीकडे जाण्यासाठी हा एकमेव जुना पूल आहे, त्यामुळे बहुतांशी वाहनधारक याच पुलाचा वापर करतात. विशेष म्हणजे, या पुलापर्यंत जाणारा रस्ताही कच्चा आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कामही रखडले आहे. त्यावर दिवाबत्तीची सुविधा नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांची कसरत होत आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पुलाची नियमित डागडुजी केल्यास घणसोली आणि तळवलीला जोडणारा हा एक कायमस्वरूपी पर्याय होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.>हा पूल पुढे खाडीला मिळतो; परंतु पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे, तसेच त्यात मेलेली कुत्री, डुकरे टाकून दिली आहेत, तसेच या घाणीत उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.