शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘छत्री घेऊन बाहेर पडा; पण मतदान नक्की करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 00:22 IST

ऑक्टोबर महिना सुरू झाला, तरी पाऊस काही परतीचे नाव घेत नाही. दिवाळीपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने विधानसभेच्या मतदानावर पावसाचे सावट कायम आहे.

पनवेल : ऑक्टोबर महिना सुरू झाला, तरी पाऊस काही परतीचे नाव घेत नाही. दिवाळीपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने विधानसभेच्या मतदानावर पावसाचे सावट कायम आहे. त्यामुळे मतदारांनो, छत्री घेऊन बाहेर पडा; पण मतदान करा, असे आवाहन प्रशासन व उमेदवारातर्फे केले जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी ईव्हीएम मशिन्स मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेवर पावसाचे सावट असून, यंत्रे सुरक्षितरीत्या मतदान केंद्रांवर पोहोचतील, याची काळजी त्या-त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये यंत्रणेकडून घेण्यात आली आहे. सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया सकाळी ७ पासून सुरू होईल. त्यामुळे त्या-त्या मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन, कर्मचारी वाहने घेऊन रविवारी मतदान केंद्रांवर रवाना झाल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस आल्यास या भागातील व्यवस्थापन प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोबाइल नेता येणार नाही.

पावसाचे सावट असल्याने प्रशासन व उमेदवारापुढे जास्तीत जास्त मतदान होण्याचे आव्हान असणार आहे. सोमवारीही पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी उमेदवार व प्रशासनाला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सामाजिक संस्थांकडूनही जागृती करीत आहेत.

निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. संवेदनशील मतदार केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मतदान केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019