शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

'अत्यावश्यक सेवेत समावेश करा', माथाडी कामगारांचे रेल्वे स्टेशन बाहेर आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 10:42 IST

Navi Mumbai : कष्टांची व अंगावरील स्वरुपात कामे करणा-या माथाडी कामगारांना शासनाने न्याय द्यावा,अशी मागणी व विनंती माथाडी कामगारांच्या- वतीने माथाडी कामगार युनियनने केली आहे.

नवी मुंबई : बाजार समित्या व अन्य जीवनावश्यक मालाच्या व्यवसायात कामे करणा-या माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वेने आणि  महापालिका बस व एसटी बसने प्रवास करण्यास परवानगी द्यावी तसेच या घटकाला विशेष विमा संरक्षण कवच लागू करावे या मागण्यांची पुर्तता करण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या मशिदबंदर, डॉकयार्ड रोड, रे रोड, कुर्ला, मानखुर्द, वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दादर, भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर,डहाणू इत्यादी रेल्वे स्टेशन बाहेर कोरोनाची नियमावली आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत स्टेशन प्रबंधकांना निवेदन सादर करून कामगार व महाराष्ट्र दिन साजरा केला.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्व ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर केल्यापासून माथाडी कामगार व अन्य घटक बाजार समितीच्या आवारात नागरिकांच्या अन्न-धान्य, कांदा बटाटा, मसाले, भाजी व फळे, गॅस सिलिंडर या जीवनावश्यक मालाची आणि जनावरांचे खाद्य व पिकांचे खत व अन्य मालाची लोडिंग व अनलोडिंगची कामे जीव मुठीत घेऊन करीत आहेत. ही कामे करताना अनेक माथाडी कामगारांना कोरोनाची लागण झाली तर अनेक माथाडी कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.गे ल्या वर्षभरापासून माथाडी कामगार ही मागणी करीत आहेत,परंतु महाराष्ट्र सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नाही.

डॉक्टर, महापालिका कर्मचारी कोरोना रूग्णांची सेवा करीत आहेत तर पोलीस यंत्रणा संरक्षण देण्याचे काम करीत आहेत आणि माथाडी कामगार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहे. मग या कष्टांची कामे करणा-या घटकाला अत्यावश्यक सेवेत घेणे, त्यांना रेल्वेने व महापालिका बस आणि एसटी बसने प्रवास करण्यास परवानगी देणे तसेच त्यांना विमा संरक्षण कवच लागू करणे या मागणीकडे महाराष्ट्र  शासन का दुर्लक्ष करीत आहे. कष्टांची व अंगावरील स्वरुपात कामे करणा-या माथाडी कामगारांना शासनाने न्याय द्यावा,अशी मागणी व विनंती माथाडी कामगारांच्या- वतीने माथाडी कामगार युनियनने केली आहे.

माथाडी कामगार हा कष्टाची कामे करणारा घटक आहे,या घटकाच्या न्याय मागणीसाठी शांततेने व कोरोना नियमावलीचे पालन करीत  रेल्वे व पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल माथाडी कामगार संघटनेने आभार मानले असून,याबाबत शासनाला शिफारस करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस