शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

झिरो गार्बेजच्या ठरावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 2:51 AM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून, सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

वैभव गायकर पनवेल : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून, सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिकेने झिरो गार्बेज संकल्पना राबविण्याचा निश्चय केला असून याकरिता नुकताच याबाबतचा ठराव पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला.सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन ही पालिकेसह सर्वच व्यवस्थापनाला न झेपणारी अशी बाब आहे. याकरिता लागणारे मनुष्यबळ तसेच आर्थिक बाजूचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भार हा संबंधित प्रशासनाच्या तिजोरीवर पडत असतो आहे. यासंदर्भात योग्य नियोजन व जनजागृती केल्यास घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. या गोष्टीला पर्याय म्हणून झिरो गार्बेज संकल्पना पुढे आली आहे. नुकताच पनवेल महापालिकेनेही यासंदर्भात ठराव मंजूर करून स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे.पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या कुंड्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होतेच, त्याचबरोबर रहदारीलाही अडथळा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनात हा एक प्रकारे अडथळा आहे. त्यामुळे आगामी काळात पनवेल महापालिका कचराकुंड्यामुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाचा आहे.पनवेल शहरात ओल्या-सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत नाही. एकंदरच महापालिका क्षेत्रात या कचराकुंड्या व्यवस्थापन बिघडत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता मायक्र ो प्लानिंग सुरू असून, कचराकुंड्यांना थारा देण्यात आला नसल्याचे समजते. ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरणाची सवय सोसायट्यांना लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओला कचरा त्याच ठिकाणी जिरविण्याचे नियोजनसुद्धा सुरू आहे. तसेच यासंदर्भात झिरो गार्बेज या संकल्पनेनुसार पालिकेने ठराव मंजूर केल्याने घनकचरा व्यवस्थापनाला गती प्राप्त होणार आहे. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी यांनी सर्वप्रथम सभागृहात आवाज उठवला होता. झिरो गार्बेज संकल्पनेनुसार त्यांनी तळोजा फेज वनमध्ये पहिल्यांदा संकल्पना राबविली आहे.घनकचरामुक्त तळोजा शहर ही मोहीम ते सध्या राबवत असून, त्याच धर्तीवर पालिकेने केलेला झिरो गार्बेजचा ठराव महत्त्वपूर्ण मानला जात आहे.>काय आहे झिरोगार्बेज संकल्पनाकचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्या कचºयाचे विघटन करणे म्हणजेच झिरो गार्बेज. या व्यतिरिक्त ओल्या, सुक्या कचºयाचे एकाच जागेवर वर्गीकरण केल्यास पुढील घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सोपी होते.वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पाहणी दौºयाची मागणीकोकणातील वेंगुर्ले नगरपरिषदेने झिरो गार्बेज ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. कचºयापासून मिथेन, विविध प्रकारची खते, बायोगॅस, प्लास्टिकपासून रस्ते अशा प्रकारच्या अनेक संकल्पना नगरपरिषदेने सत्यात उतरविल्या आहेत.याच धर्तीवर पनवेल शहराचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांचा वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत अभ्यास दौरा आयोजित करण्याची मागणी शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी पालिकेकडे केली आहे.>झिरो गार्बेज संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाचाच एक भाग आहे. याकरिता महापालिका विविध उपाययोजना राबविणार आहे. पालिका हद्दीतील नागरिकांनी याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आपल्या सवयीत बदल करणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ, सुंदर होण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावल्यास झिरो गार्बेज संकल्पना सत्यात उतरेल.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त,पनवेल महानगरपालिका